Homeटॉप स्टोरीयेत्या १९ जूनला...

येत्या १९ जूनला ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन?

येत्या 19 जून रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

उद्धव ठाकरे यांचा गट येत्या 19 जूनला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा घेणार आहे. हा मेळावा नियमबाह्य आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून घेतला जाणारा मेळावा अधिकृत आहे. उद्धव ठाकरे गटाचा, जे काय त्यांना तात्पुरते नाव मिळाले होते- शिवसेना उबाठा, याची स्थापना दहा ऑक्टोबर 2022 रोजी झालेली आहे. त्यामुळे 19 जूनला शिवसेनेचा नावाने हे मेळावा घेऊ शकत नाहीत आणि असा जर मेळावा त्यांनी घेतला तर त्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाऊ शकते, असेही नितेश राणे म्हणाले.

ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राजाराम राऊत यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत नाकीनऊ आल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे खरे आहे. मोदी सरकारच्या सरकारच्या काळात दहशतवाद्यांचे, भ्रष्टाचाऱ्यांना नक्की नाकीनऊ आले. तुमच्या मालकाला नाकीनऊ आले. त्यामुळे चार वेळा घरी डॉक्टरांना बोलावावे लागले, असे त्यांनी सांगितले.

या नऊ वर्षांत देशाने जी प्रगती केली आहे, पंतप्रधान मोदी यांनी देशाला महासत्तेच्या दिशेने नेले आहे, हे राऊतांसारख्या राजकीय दलालाला कधी कळणार नाही. हे म्हणतात की पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेतलेली नाही. मग अडीच वर्षे तुमचे मुख्यमंत्री जे फेसबुक लाईव्हचा सपाटा चालवत होते, तेव्हा त्यांना का नाही सांगितलं की पत्रकार परिषद घ्या. तुम्ही पंतप्रधानांना लोकांची मन की बात ऐकायला सांगता… तुमच्या मालकांना तुम्ही का नाही सांगितलं की लोकांच्या मन की बात ऐका, फक्त पाटणकरांची नको. तुम्ही म्हणता कायदा कोठ्यावर नाचतो. अशी भाषा तुम्हीच करू शकता. कारण, आरेच्या गेस्ट हाऊसमध्ये कोण कुठे नाचत होते, तुम्हाला माहित आहे. तुमच्या मालकाचा मुलगा महाविकास आघाडीच्या काळात रोज संध्याकाळी साडेसातनंतर डिनो मोरियाच्या घरी कोणाकोणाला नाचवायचा, किती अधिकारी नाचायचे, हे पण जरा सांगा… असे राणे म्हणाले.

भारतीय जनता पार्टीचा झेंडा, हा शेठजींचा झेंडा आहे असे बोलण्याची हिंमत तुमची कशी झाली? तुमच्या मालकाचा हातात आता झेंडा राहिला नाही आणि काठीही राहिली नाही. भाजपाचा झेंडा हिंदुत्वाचे प्रतीक आहे. हा मराठी माणसाचा अभिमान आहे. मुंबईतल्या मराठी माणसांचा टक्का कमी कोणामुळे झाला? तुमच्या मालकाच्या दलालीमुळे ही वेळ कशी आली, हेही तुम्ही सांगितलं तर बरं होईल. तुमचे मालक आता लंडनमध्ये फिरत आहेत. त्यांचं बिल कुठचे शेठजी आणि व्यापारी भरत आहेत याची नावे जाहीर करू का, असा सवालही नितेश राणे यांनी केला.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content