Homeटॉप स्टोरीएसटी कामगारांना ‘शासकीय...

एसटी कामगारांना ‘शासकीय सेवा’ नाहीच?

राज्यातल्या एसटी कामगारांना शासकीय सेवेत समाविष्ट करता येणार नाही, असे आज काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सूचित केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या एका उच्चस्तरीय अभ्यास समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वीच सरकारमधल्या एका जबाबदार मंत्र्यांनी हे विधान केल्यामुळे एसटी कामगारांच्या विलिनीकरणावर सरकारने काय ठरवले आहे, हे स्पष्ट होते, असा सूर संपकरी एसटी कामगारांमध्ये उमटू लागला आहे.

एसटी कामगारांचे शासकीय सेवेत विलिनीकरण करावे या मागणीसाठी कामगार संपावर आहेत. एसटी कामगारांना सरकारी नोकरीत समाविष्ट करता येणार नाही, असे दिसते आहे. त्यासंबंधीची चौकशी करणारा अहवाल अजून यायचा आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय वगैरे अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे एसटी कामगारांनीही अधिक न ताणता संप मागे घ्यावा, असे आवाहन थोरात यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. मुख्यमंत्री आजारी असले तरी ते साऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. परिवहन मंत्री अनिल परब चांगल्या पद्धतीने संप हाताळत आहेत, असेही ते म्हणाले.

विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात विधानसभेला नवीन अध्यक्ष मिळेल. हे अध्यक्ष काँग्रेसचेच असतील. अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल हे पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून निश्चित केले जाईल, असेही थोरात यांनी सांगितले.

राज्यात सहकार हा विषय चांगल्या पद्धतीने राबविला जात आहे. राज्यात जी समृद्धी दिसत आहे त्यात सहकाराचाच वाटा मोठा आहे, असेही त्यांनी सांगितले.

अलिकडे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल संपलेले आहे. भाजपा कार्यकर्त्यांना सावरण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात भाजपाची अधोगती सुरू आहे. आमचे सरकार चांगले काम करत आहे. पुढील निवडणुकीतही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असेही थोरात यांनी सांगितले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content