Homeचिट चॅटस्वातंत्र्यसैनिकांचा पराक्रम महाविद्यालयीन...

स्वातंत्र्यसैनिकांचा पराक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रमात?

येत्या काळात देशातल्या स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात आमण्याच्या दृष्टीने एक समिती गठित केली जाईल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी दिले.

लोकमान्य टिळक जयंती दिनी कुलगुरुंच्या हस्ते कृतज्ञता ध्वजस्तंभावरील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानावर त्यांनी पुष्पार्पण केले. त्याप्रसंगी प्रा. कुलकर्णी बोलत होते. या समारंभाचे आयोजन स्वराज्यभूमी स्मारक समितीने केले व व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ड विभागाने केले. स्वराज्यभूमी समितीच्या वतीने प्रकाश सिलम, उज्ज्वला मेहेंदळे, नंदकुमार मादुस्कर, रागिणी रावल, किरण गुरव, गिरीश कुलकर्णी, अविनाश जाधव, बाळासाहेब हेगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तर महापालिका ड विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त शरद उघडे, संजय पोळ, रावसाहेब सांगोळकर व सुशील बडेकर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांचे नाव घेणेसुद्धा राजद्रोहाचा गुन्हा होता. एव्हढी इंग्रजांना लोकमान्य टिळकांची दहशत होती. असे असूनही स्वातंत्र्यसैनिकांनी लोकमान्य टिळकांच्या अंत्यविधीस्थानी लोकमान्य टिळकांचे स्मारक उभारले जावे म्हणून इंग्रजांच्या दंडेलीला न जुमानता तेरा वर्षानंतर १९३३मध्ये गिरगाव चौपाटी येथील पुतळा उभारण्यात यश मिळविले. पण हा चित्तथरारक इतिहास कोकणापासून गडचिरोलीपर्यंतच्या मुलांना का माहित नसावा? इतकेच नव्हे तर विधानसभेत बसणार्‍या बहुतेक सदस्यांना माहित नसावा, का? याची खंत प्रकाश सिलम आणि उज्ज्वला मेहेंदळे यांनी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यापुढे बोलताना व्यक्त केली. तेव्हा कुलगुरुंनी यावर समिती नेमून लवकरात लवकर हा विषय अभ्यासक्रमात घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि स्वराज्यभूमी समिती सदस्यांना यासंबंधात सविस्तर चर्चेसाठी आमंत्रण दिले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content