Homeचिट चॅटनवी मुंबईला पूर्णकालिक...

नवी मुंबईला पूर्णकालिक शहर अभियंता मिळणार तरी केव्हा?

एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहर अभियंता, हे पद महत्त्वाचे असते याचा कदाचित विसर नवी मुंबई महानगरपालिकेला पडलेला आहे. यामुळेच नवी मुंबईत दोन वर्षांपासून कार्यकारी अभियंताच्या माथी शहर अभियंतापदाची जबाबदारी दिली आहे.

ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी नवी मुंबई महापालिकेकडे शहर अभियंतांबाबत विविध माहिती मागितली होती. नवी मुंबई महापालिकेचे सामान्य प्रशासन विभागाचे प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात यांनी अनिल गलगली यांना 2 एप्रिल 2021चे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाची प्रत दिली आहे. या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, नवी मुंबई महापालिकेत शहर अभियंता या पदावर कार्यरत असलेले सुरेंद्र वासुदेव पाटील हे नियत वयोमानानुसार 31 मार्च 2021 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ संजय गोपाळ देसाई, कार्यकारी अभियंता यांना मूळ विभागाचे कामकाज सांभाळून शहर अभियंता या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत पाहावयाचा आहे.

अतिरिक्त कार्यभार देताना शासनाच्या मंजुरीची प्रत, अतिरिक्त कार्यभाराची जास्तीतजास्त कालावधीची माहिती, जाहिरातीची प्रत, प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवण्यासाठी शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत अभिलेखावर उपलब्ध नसल्याचा दावा खरात यांनी केला आहे. गलगली यांनी 2 वर्षे शहर अभियंतासारखे पद अतिरिक्त कार्यभारावर देण्यामागचे गौडबंगाल काय आहे? अशी विचारणा करत चौकशीची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांकडे केली आहे. तत्काळ प्रभावाने राज्य शासनाने या पदावर योग्य व्यक्तींची निवड करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content