Homeमाय व्हॉईसया रेतीच्या धुलिकणांचे...

या रेतीच्या धुलिकणांचे करायचे तरी काय?

म्हणे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण आणि धुलिकण यांचे प्रमाण वाजवीपेक्षा वाढले आहे. त्वरित उपाययोजना करा असे साक्षात पंतप्रधान कार्यालयातून फर्मान आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासकट सर्वांचीच एकच धावपळ सुरू झालेली आहे. काही प्रमाणात प्रदूषणाचा स्तर कमीही झालेला दिसतो. परंतु पंतप्रधान कार्यालयाने आपल्या अख्त्यारितील मंत्रालयांनाही तशी ताकीद द्यायला हवी.

कालच एका ठिकाणी जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडीने घाटकोपर स्थानकावर उतरलो. फलाट क्रमांक दोनवर गेले अनेक दिवस काही काम चालू आहे. त्या फलाटावर अनेक ठिकाणी रॅबीट व रेतीचे ढीग दिसले. तेही उघडे… त्यावर ताडपत्री टाकण्याची तसदी त्या कंत्राटदाराने घेतलेलीच नव्हती. क्रमांक दोनवरून जलद गाड्या तसेच बाहेरगावी जाण्याऱ्या अतिजलद गाड्याही जात असतात हे मी सांगायला नको. जलद गाड्या जातेवेळी या रेतीचे धुलिकण किती वेगाने हवेत मिसळले जात असतील याचा विचारच केलेला बरा!

गाडी फलाटावर आल्यावर डब्यात शिरायचे की धुळीपासून स्वतःला वाचवायचे हा मोठा प्रश्नच प्रवाशांपुढे पडतो. अनेकवेळा विचार करण्यात गाडी चुकायचीही भीती असते! असेच रेतीचे आणि रॅबीटचे ढीग अनेक रेल्वेस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून पडून आहेत. ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरही (पश्चिम) असा रेतीचा ढीग गेले 10 दिवस पडून आहे आणि तोही उघडाच… आता पंतप्रधान कार्यालयाने थेट रेल्वेमंत्र्यानाच फोन केला पाहिजे, असे अनेक नगरिकांनी या प्रतिनिधीला सांगितले.

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content