Homeएनसर्कलविनायक खेडेकर, सुनयना...

विनायक खेडेकर, सुनयना हजारीलाल ठरले अकादमी फेलो!

संगीत, नृत्य आणि  नाट्य कलेशी संबंधित संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या जनरल कौन्सिलने नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कला क्षेत्रातील सहा नामवंतांची अकादमी फेलो (अकादमी रत्न) म्हणून एकमताने निवड केली. विनायक खेडेकर, आर. विश्वेश्वरन, सुनयना हजारीलाल, राजा आणि राधा रेड्डी, दुलाल रॉय आणि डी. पी. सिन्हा अशी या नामवंतांची नावे आहेत.

अकादमीची फेलोशिप हा सर्वात प्रतिष्ठित आणि दुर्मिळ सन्मान आहे, जो कोणत्याही वेळी जास्तीतजास्त 40 कलाकारांना दिली जातो. जनरल कौन्सिलने संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022 आणि 2023 वर्षांसाठी संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक/लोक/आदिवासी संगीत/नृत्य/नाट्य, कठपुतळी आणि एकूणच योगदान/शिष्यवृत्ती या क्षेत्रातील कलाकारांची निवड केली आहे.

अकादमीच्या जनरल कौन्सिलने 2022 आणि 2023 या वर्षांसाठी संगीत नाटक अकादमीच्या ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी’ 80 तरुण कलाकारांचीदेखील निवड केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र आणि शाल तसेच 25,000/- रुपये असे आहे. हे पुरस्कार संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षांच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.

1952पासून अकादमी पुरस्कार प्रदान केले जात आहेत. अकादमी रत्नच्या सन्मानार्थ ताम्रपत्र आणि शाल याव्यतिरिक्त 3, 00, 000/- रुपये दिले जातात. तर अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1,00,000/- रुपये आहे. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.

Continue reading

टिटवीच्या अंड्यांमध्ये दडलेय पावसाचे रहस्य!

देशातील काही भागात शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, टिटवीची अंडी मान्सूनच्या आगमनाचे आणि तीव्रतेचे अचूक संकेत देतात. टिटवीने दिलेल्या अंड्यांची संख्या, अंडी घालण्याची जागा यानुसार पारंपरिकरित्या, पिढ्या न् पिढ्या देशाच्या काही भागात मान्सूनच्या पावसाचे ठोकताळे आणि अंदाज बांधले जातात. अंड्यांची...

आता देशातच बनणार एमआरआय मशिन, चाचण्यांचे दर होणार ७०%पर्यंत कमी!

भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बेंगळुरूस्थित 'व्होक्सेल ग्रिड्स' या कंपनीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय...

आठवलेंची ‘आरपीआय’ उत्तर प्रदेशात लढवणार विधानसभा निवडणूक!

उत्तर प्रदेशातील आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ने राज्यात आपली ताकद आजमावण्याची तयारी पूर्ण केली आहे. भाजपासोबतच्या महायुतीत (एनडीए) राहून आरपीआयने उत्तर प्रदेशात २५...
Skip to content