Homeएनसर्कलविनायक खेडेकर, सुनयना...

विनायक खेडेकर, सुनयना हजारीलाल ठरले अकादमी फेलो!

संगीत, नृत्य आणि  नाट्य कलेशी संबंधित संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या जनरल कौन्सिलने नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कला क्षेत्रातील सहा नामवंतांची अकादमी फेलो (अकादमी रत्न) म्हणून एकमताने निवड केली. विनायक खेडेकर, आर. विश्वेश्वरन, सुनयना हजारीलाल, राजा आणि राधा रेड्डी, दुलाल रॉय आणि डी. पी. सिन्हा अशी या नामवंतांची नावे आहेत.

अकादमीची फेलोशिप हा सर्वात प्रतिष्ठित आणि दुर्मिळ सन्मान आहे, जो कोणत्याही वेळी जास्तीतजास्त 40 कलाकारांना दिली जातो. जनरल कौन्सिलने संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022 आणि 2023 वर्षांसाठी संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक/लोक/आदिवासी संगीत/नृत्य/नाट्य, कठपुतळी आणि एकूणच योगदान/शिष्यवृत्ती या क्षेत्रातील कलाकारांची निवड केली आहे.

अकादमीच्या जनरल कौन्सिलने 2022 आणि 2023 या वर्षांसाठी संगीत नाटक अकादमीच्या ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी’ 80 तरुण कलाकारांचीदेखील निवड केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र आणि शाल तसेच 25,000/- रुपये असे आहे. हे पुरस्कार संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षांच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.

1952पासून अकादमी पुरस्कार प्रदान केले जात आहेत. अकादमी रत्नच्या सन्मानार्थ ताम्रपत्र आणि शाल याव्यतिरिक्त 3, 00, 000/- रुपये दिले जातात. तर अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1,00,000/- रुपये आहे. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content