Homeचिट चॅटएमआरव्हीसीच्या अध्यक्षपदी विलास...

एमआरव्हीसीच्या अध्यक्षपदी विलास वाडेकर

मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून विलास वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते येत्या 31 जानेवारीला सेवानिवृत्त होत असलेल्या सुभाष चंद गुप्ता यांची जागा घेणार आहेत. सध्या वाडेकर एमआरव्हीसीमध्ये संचालक (तांत्रिक) या पदावर कार्यरत आहेत. ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेच्या (आयआरएसई) 1991च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

वाडेकर यांनी अमरावती विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून सर्व शाखांमध्ये अव्वल येत तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. त्यांनी स्थापत्य-संरचना अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणीतील विशेष गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांना भारतीय रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये तीन दशके काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी प्रकल्प नियोजन, अंमलबजावणी, संचालन आणि प्रशासकीय कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2019मध्ये वाडेकर यांची केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती झाली. याद्वारे त्यांचे तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्त्वक्षमता अधोरेखित झाली. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रकल्पांमध्ये त्यांचा 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे.

वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वाचे प्रकल्प:

ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका.

उधना-जळगाव दुहेरीकरण आणि विद्युतीकरण.

एमयूटीपी-III: विरार-डहाणू चौपदरीकरण व बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका प्रकल्पांसाठी नियोजन, आरेखन व मान्यता मिळवणे, तसेच वनविभागाची मंजुरी मिळवणे.

अनधिकृत प्रवेश नियंत्रण कार्य.

तुर्भे-नेरुळ ट्रान्स हार्बर लाईन.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content