Homeचिट चॅटपुराणिक स्मृती क्रिकेटः...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन विजेता

क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजेतेपद पटकाविले. निर्णायक सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने सलामी फलंदाज सारा सामंत (४५ धावा) व कप्तान पूनम राऊत (नाबाद ४७ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबचा ८ विकेटने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली.

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतिम  सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने नाणेफेक जिंकून एमआयजी क्रिकेट क्लबला प्रथम फलंदाजी दिली. प्रारंभ २ बाद १५ धावा असा निराशाजनक होऊनही मिताली म्हात्रे (५२ चेंडूत ५२ धावा, ५ चौकर) व महेक मिस्त्री (३० चेंडूत २७ धावा, ४ चौकार) यांनी डाव सावरला. त्यामुळे एमआयजी क्लबने मर्यादित २० षटकात ६ बाद १२० धावांचा टप्पा गाठला. मध्यमगती गोलंदाज सिद्धी पवारने २६ धावांत ३ बळी घेतले. सलामी फलंदाज सारा सामंत (२२ चेंडूत ४५ धावा, ९ चौकार) व अष्टपैलू पूनम राऊत (३४ चेंडूत नाबाद ४७ धावा, ८ चौकार) यांच्या फटकेबाजीमुळे दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने विजयी लक्ष्य १३.५ षटकात २ बाद १२३ धावा झळकावून साध्य केले. परिणामी एमआयजी क्रिकेट क्लबला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार वेंगसरकर फाउंडेशनची कप्तान पूनम राऊतने पटकाविला. माजी कसोटीपटू करसन घावरी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सेक्रेटरी अभय हडप, खजिनदार अरमान मलिक, जॉईंट सेक्रेटरी दीपक पाटील तसेच अपेक्स कौन्सिल मेंबर, विजय येवलेकर, संजू खानोलकर, सुनील रामचंद्रन, सुनील पाटील, महेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content