Homeचिट चॅटमीराबाई चानूचे मायदेशी...

मीराबाई चानूचे मायदेशी जल्लोषात स्वागत!

टोक्यो ऑलिंपिकमधील भारताची पहिली पदक विजेती सैखोम मीराबाई चानू आणि तिचे प्रशिक्षक विजय शर्मा काल संध्याकाळी स्वदेशी परतले. भारतात त्यांचे भव्य, जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या घरी आयोजित विशेष सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय विधि आणि न्याय मंत्री किरेन रीजीजू, केंद्रीय ईशान्य भारत क्षेत्र विकास मंत्री किशन रेड्डी, केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसीथ प्रामाणिक यावेळी आवर्जून उपस्थित होते.

भारोत्तोलनात महिलांसाठीच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवलेल्या मीराबाई चानूने सामर्थ्य आणि मनाची तयारी यासाठीचे प्रशिक्षक एरॉन होर्शिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी 1 मे रोजी अमेरिकेला प्रयाण केले होते. कोविड-19मुळे भारतातून येणाऱ्या लोकांवर अमेरिकेत प्रवासासाठीचे निर्बंध लागू होण्याच्या काही दिवसांपूर्वी अत्यंत कमी काळात सरकारने चानूला अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जाण्यास सहाय्य केले.

सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. त्याशिवाय पदकापर्यंतचा माझा प्रवास शक्य नव्हता. माझे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. याच क्षणासाठी मी कित्येक वर्षे प्रशिक्षण घेत होते आणि सर्वांसाठीच भव्य असणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा मंचावर माझे स्वप्न साकार झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया हर्षभरित चानूने यावेळी व्यक्त केली.

गेल्यावर्षी माझ्या खांद्याशी संबंधित दुखापतीवर उपचारासाठी केलेला अमेरिकेचा दौरा पदकांसाठीच्या माझ्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरला. टारगेट ऑलिंपिक पोडियम योजनेने (TOPS) माझे करियर तसेच पदकांविषयीच्या अपेक्षा उंचावल्या, असेही चानू म्हणाली.

खेळाडूंच्या नवीन पिढीला हा विजय प्रेरणा देत राहील

मीराबाई चानूचे यश, टोक्यो ऑलिम्पिकच्या पदक सोहळ्यात भारताचा झेंडा फडकावला गेला आणि भारताचे राष्ट्रगीत वाजू लागले तेव्हा १३० कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला, असे उद्गार अनुराग ठाकूर यांनी काढले.

पदक आणण्याचा शब्द तिने पाळला

किरण रिजिजू यांनी सांगितले की, टोक्योला जाण्यापूर्वी झालेल्या आमच्या संभाषणात तिने देशासाठी पदक आणण्याचे वचन दिले होते आणि तो शब्द तिने पाळला. तिने भारताला मिळवून दिलेला गौरव आणि मान तिच्या वर्षांनुवर्षाच्या चिकाटीचे, समर्पणाचे आणि कठोर मेहनतीचे फळ आहे. तिच्यावर जो प्रशंसेचा वर्षाव होत आहे त्यावर तिचा पुरेपूर अधिकार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content