Homeटॉप स्टोरी८४ सामने-वेळापत्रक जाहीर!...

८४ सामने-वेळापत्रक जाहीर! ‘आयपीएल’चा महासंग्राम उद्यापासून!

क्रिकेटप्रेमींनो, प्रतीक्षा संपली! बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२६च्या संपूर्ण वेळापत्रकाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत देशभरात १० संघांमध्ये तब्बल ८४ सामन्यांचा महासंग्राम रंगणार आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले होते; पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित झाल्यानंतर आता उर्वरित ५० सामन्यांचेही वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आयपीएलच्या १९व्या पर्वाची ही सुरुवात म्हणजे क्रिकेटविश्वासाठी एक मोठी दिवाळीच!

उद्घाटन सामना आणि ठळक वैशिष्ट्ये

विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना २८ मार्चला चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. त्यापाठोपाठ २९ मार्चला मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान स्वीकारेल, तर ३० मार्चला चेन्नई सुपर किंग्ज राजस्थान रॉयल्सविरुद्ध रिंगणात उतरेल. दुसऱ्या टप्प्यातील सामने १३ एप्रिलपासून सुरू होतील आणि ते बेंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगड अशा १२ मैदानांवर खेळवले जातील.

या हंगामाचे ५ खास मुद्दे

यंदा आयपीएल ८४ सामन्यांपर्यंत विस्तारला आहे, ज्यात मागील हंगामापेक्षा तब्बल १० सामने अधिक आहेत. ही क्रिकेटप्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे. दुसरे महत्त्वाचे- कॅमेरून ग्रीनला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल ₹ २५.२० कोटींना विकत घेतले, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रवींद्र जडेजा सीएसकेतून राजस्थान रॉयल्समध्ये गेला असून, त्या बदल्यात टी-ट्वेण्टी वर्ल्डकपचा ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ संजू सॅमसन आता सीएसकेच्या गळ्यातील ताईत बनला आहे हे संपूर्ण हंगामाची रंगत वाढवणारे आहे! चौथा मुद्दा- बेंगळुरू शहर उद्घाटन सोहळा आणि अंतिम सामना या दोन्हींचे यजमानपद भूषवणार आहे. पाचवा- २०२८पासून आयपीएल ९४ सामन्यांपर्यंत विस्तारण्याची योजना असून, पूर्ण डबल राऊंड-रॉबिन फॉर्मॅट परत येणार आहे. सहावा- धावांचा पाऊस पाडणारा वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये काय करतो याकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

आयपीएल २०२६ चा हंगाम म्हणजे केवळ क्रिकेट नाही, हा एक राष्ट्रीय उत्सव आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, महागाईचे सावट आणि राजकीय धामधुमीच्या पार्श्वभूमीवर, लाखो क्रिकेटप्रेमींसाठी हा हंगाम एक सुखद विरंगुळा ठरेल यात शंका नाही. आता चेंडू टाकला जाणार आहे, स्टेडियम गाजणार, स्क्रीन उजळणार, आणि क्रिकेटचा जल्लोष घराघरात पोहोचणार!

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content