Homeपब्लिक फिगरपहिल्या पॅरा खेलो...

पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आजपासून दिल्लीत!

पहिली खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धा आजपासून नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

खेलो इंडिया

सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डासह 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1350पेक्षा जास्त स्पर्धक या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्स, पॅरा नेमबाजी, पॅरा तिरंदाजी, पॅरा फुटबॉल, पॅरा बॅडमिंटन, पॅरा टेबल टेनिस आणि पॅरा वेटलिफ्टिंग’सह 7 क्रीडा प्रकारांमध्ये पॅरा ऍथलीट्स चुरशीची लढत देतील. या स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आयजी स्टेडियम, तुघलकाबादमधील शूटिंग रेंज आणि जेएलएन स्टेडियम अशा तीन स्टेडियममध्ये आयोजित केल्या जाणार आहेत.

पॅरा खेलो इंडिया गेम्सबद्दल बोलताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन हे एकमेकांच्या भावना समजून घेणाऱ्या सर्वसमावेशक समाजाच्या निर्मिती आणि बळकटीकरणाच्या दिशेने एक पाऊल आहे. नवी दिल्लीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी आठवडाभर चालणाऱ्या ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’मुळे भावनांचा कोलाहल आणि भारतीय क्रीडाप्रेमींना आतापर्यंत न दिसलेली गुणवत्ता प्रदर्शित करण्यात मदत होईल.

ते पुढे म्हणाले की, 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1400 पॅरा ऍथलीट दिल्लीत एकत्र जमलेले पाहणे भारावून टाकणारे असेल. सर्व्हिसेस स्पोर्ट्स बोर्डाच्या खेळाडूंची उपस्थिती, या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सना निश्चितच एक अतिरिक्त आयाम देईल.

खेलो इंडिया हे निश्चितपणे आमूलाग्र बदल घडवून आणणारे ठरले आहे. या उपक्रमाने केवळ क्रीडा प्रकार  लोकांपर्यंत नेले नाही तर देशभरातल्या अनेक अकादमी आणि योजनांसह वैज्ञानिक आणि आधुनिक दृष्टीकोन अंतर्भूत केला आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

खेलो इंडिया पॅरा गेम्स देखील मुख्य प्रवाहातील जीवनात दिव्यांगांच्या प्रतिभेचा उपयोग करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांशी सुसंगत आहेत. व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण देणे, व्यवसायासाठी सवलतीच्या दरात कर्जे पुरवणे यासारख्या उपक्रमांमुळे आर्थिक तसेच सामाजिक सबलीकरणाला चालना मिळाली आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्सने या उपक्रमांना बळकट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content