Homeपब्लिक फिगरशैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण...

शैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात पुणे नेहमीच आघाडीवर!

धर्मेंद्र प्रधान, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात आयोजित विद्यार्थी संमेलन समारंभात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना, प्रधान यांनी पुण्याची महती सांगितली. पुणे शहर शैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात नेहमीच आघाडीवर आहे. भारतीय समाजरचनेला दिशा देण्यात पुण्याने आघाडीची भूमिका घेतली होती, आणि यामधल्या केंद्रस्थानापैकी सावित्रीबाई फुले विद्यापीठ एक होते, असा उल्लेख त्यांनी केला.

आज नव्याने उदयाला येत असलेल्या अर्थव्यवस्थाना भारत-प्रणित मॉडेल कडून अनेक अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांची पूर्तता करण्याची पुण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण संशोधन, धोरणात्मक निर्णय, शिक्षण, लोककल्याण-केंद्री प्रशासन आणि महिला-प्रणित विकास, वैज्ञानिक संशोधन अशा महत्त्वाच्या क्षेत्रात, पुण्याने दिलेल्या योगदानाबद्दल प्रधान यांनी आपल्या भाषणातून भर दिला.

जागतिक पर्यावरणीय आरोग्यासाठी कार्यरत आणि पुण्यात काही काळ काम केलेले प्रसिद्ध प्राध्यापक किर्क स्मिथ यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचाही त्यांनी उल्लेख केला. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना एलपीजी अनुदान देण्याच्या त्यांच्या सूचनांमुळे उज्ज्वला योजनेची सुरुवात झाली, असे प्रधान यांनी नमूद केले.

पुणे

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (जीआयपीई) संस्थेच्या 29 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, इतर मान्यवर आणि शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीक्षांत समारंभात बोलतांना प्रधान यांनी आज पदवी मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना आपल्या क्षमता आणि जीवनकौशल्ये वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. जीआयपीई ही संस्था अनेक अभिनव कल्पनांचे आगर आहे, तसेच प्रयोगशील शिक्षणाचेही केंद्र आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

पुणे

भारतातील या गुणवान युवा शक्तीच्या जोरावर, येत्या 25 वर्षात, देशात अनेक महत्वाच्या घडामोडी होणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. म्हणूनच युवकांनी विचारांचा व्यापक पल्ला ठेवत समाजाच्या आकांक्षा तसेच जागतिक जबाबदाऱ्या पार पडण्याच्या दृष्टीने स्वतःची तयारी करत पुढे वाटचाल करावी.

एकविसावे शतक, ज्ञान-आधारित समाजाचे शतक राहणार असून त्यात विकास, वृद्धी, अर्थकारण आणि एकूणच समाजाच्या उभारणीसाठी ज्ञान हाच प्राथमिक आधार असेल. आज भारतीयांवर नव्या जागतिक जबाबदाऱ्या आहेत तसेच त्यांची दृष्टी आणि कृती संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारी हवी यावर त्यांनी भर दिला.

भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यापासून, ते स्वातंत्र्योत्तर काळात अनेक महत्वाची धोरणे आखतांना, यात अगदी कृषी, शिक्षण, कृषिमालाची किंमत, कुटुंब नियोजन बँकिंग आणि सहकारी चळवळ अशा अनेक विषयांवर संशोधन करून या संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे, असेही प्रधान यांनी नमूद केले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात त्यांनी सिंबायोसिस ईशान्य भवनाचे उद्घाटन केले. आजच्या कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. एस. बी. मुजुमदार प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के. एच. संचेती कथ्थक नृत्यांगना शमा भाटे आणि प्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे यांचाही समावेश होता.

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content