Homeएनसर्कलऑनलाईन राखी पाठविण्याकडे...

ऑनलाईन राखी पाठविण्याकडे बहिणींचा कल

सध्या देशात कोविड-१९च्या भीतीचे सावट कायम आहे. आपल्याला पुन्हा तिसऱ्या संभाव्य लाटेला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्वत्र सावधगिरी बाळगली जात आहे. त्यातच रक्षाबंधनाचा सण जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे रक्षाबंधनात अनेक बहिणींचा आपल्या भावांना ऑनलाईन राखी पाठवण्याकडे कल दिसत आहे.

हाच काळ ओळखून विविध कुरियर सेवांनी राख्या पाठविण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन व्यवस्था केली आहे. या वर्षी रक्षाबंधनाचा सण आणखी खास बनवण्यासाठी श्री मारुती कुरिअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, या भारतातील अग्रगण्य कुरिअर आणि लॉजिस्टिक्स कंपनीने अनोखी ऑनलाईन आणि ऑफलाईन राखी बुकिंग आणि वितरण सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

देशभरात कोविड-१९चा धोका लक्षात घेता, सुरक्षित अंतर राखणे ही काळाची गरज आहे, हे पाहता कंपनीने राखी आणि चॉकलेट पॅकचे ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे आणि या सणाला ग्राहकांसाठी सुलभ व सुरक्षित वितरण करणार आहे.

या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना श्री मारुती कुरियर सर्व्हिसेस प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक अजय मोकारिया यांनी सांगितले की, या वर्षी रक्षाबंधन सुरक्षित आणि संस्मरणीय बनवण्यासाठी अनोखी राखी ऑनलाईन बुकिंग आणि डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे. सणासुदीच्या काळात ग्राहक जलद आणि सुरक्षित डिलिव्हरीसाठी उत्सुक असतात. हे लक्षात घेऊन लक्षात ठेवा, आम्ही त्यांच्यासाठी सर्वोत्तम सेवा घेऊन आलो आहोत. कोविड-१९च्या सध्याच्या आव्हानात्मक वातावरणात, आम्ही आरोग्य आणि अंतराच्या प्रोटोकॉलचे पालन करून राखीचे डिजिटल वितरण सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण काळजी घेत आहोत. 

टपाल विभागाने केली विशेष व्यवस्था

या वर्षी 22 ऑगस्ट 2021 ला राखीपौर्णिमा आहे. या प्रसंगी पोस्टाने राख्या पाठविण्यासाठी आणि या टपालाच्या सुरळीत वितरणासाठी टपाल विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. टपाल खात्याच्या दिल्ली मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतून इतर राज्यांमध्ये पोस्टाने पाठविल्या जाणाऱ्या राख्यांसाठी 16 ऑगस्ट 2021पर्यंत आणि दिल्ली मंडळात पाठविल्या जाणाऱ्या राख्यांसाठी 17 ऑगस्ट 2021पर्यंत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

दिल्लीतील 34 महत्त्वाच्या टपाल कार्यालयांमध्ये आणि दिल्ली रेल्वेस्थानक आणि नवी दिल्ली रेल्वेस्थानक या 2 आरएमएस अर्थात रेल्वे टपाल सेवा कार्यालयांमध्ये विशेष टपाल काऊंटर उभारण्यात येत आहेत. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत राख्या पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content