Homeटॉप स्टोरी‘जनाब सेना’ नाही,...

‘जनाब सेना’ नाही, हे सांगण्यासाठी शिवसेनेचा आटापिटा!

मराठी माणसांसाठी, ज्वलंत हिंदुत्वासाठी ओळखली जाणारी शिवसेना, आज आमची ‘जनाब सेना’ झाली नाही हे सांगण्यासाठी आटापिटा करत आहे. याचसाठी शिवसेनेने येत्या २२ ते २५ मार्च, या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज, रविवारी दुपारी शिवसेना भवनात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तसेच खासदारांची ऑनलाईन बैठक घेतली. कोरोना, वादळे, अवकाळी पाऊस, पूर अशा विविध नैसर्गीक संकटांच्या धावपळीत आपल्याला भेटायला उशीर झाला. पण, आता आपण जोमाने उतरत आहोत. सध्या आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. विरोधक काय काय करत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार. पण, आपणही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले पाहिजे. एमआयएमचा कट उधळून लावला पाहिजे. शिवसेनचं हिंदुत्व राज्यभर पोहोचवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विरोधकांची हवा पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. विरोधकांचे डावपेच लोकांच्याही लक्षात येत आहेत. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे आकडे आधीपेक्षा कमी झाले आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्या १२ आमदारांच्या फाईलवर राज्यपालांकडून अद्याप निर्णय झालेला नाही. हे लोकशाहीला न पटणारे आहे. आता आपण घराघरात जाणार आहोत, आपली कामे लोकांना सांगा, आपण घेतलेले निर्णय घराघरात पोहोचवा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

जनाब

येत्या २२ मार्चपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. शिवसेनेने केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेचे खासदार हे अभियान चालवतील. एका खासदाराच्या मदतीला १२ पदाधिकाऱ्यांची फळी असणार आहे. शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा २२ ते २५ मार्च, या काळात होणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हा तर भाजपाचा कट

दरम्यान, या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, एमआयएमने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी दिलेली ऑफर हा भाजपाचा कट आहे. शिवसेनेच्या बदनामीसाठी हा कट रचला गेला आहे. शिवसेनेला ‘जनाब सेना’ असे संबोधणाऱ्यांनी (भाजपाच्या नेत्यांनी नुकतीच शिवसेनेची ‘जनाब सेना’ अशी संभावना केली होती.) आपला इतिहास तपासून घ्यावा. शिवसेनेचे हिंदुत्व बदनाम करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही. शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितल्याचेही राऊत म्हणाले.

भाजपाने इतिहास विसरू नये

शिवसेनेला ‘जनाब सेना’ म्हणून संबोधणाऱ्या भाजपाने आपला इतिहास विसरू नये. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करणारी भाजपा आहे. मेहबूबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केले? हे फुटीरतावादी, दहशतवाद्यांसोबत स्थापन केलेले सरकार असल्याची टीकाही आम्ही त्यावेळी केली होती, असेही ते म्हणाले. एमआयएम भाजपाची बी टीम आहे. त्यामुळे एमआयएमसोबत युती होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content