Homeडेली पल्ससयाजी नगरी एक्सप्रेस...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि कार्यात्मक उत्कृष्टतेविषयी जागरूकता दाखवताना पश्चिम रेल्वेने 344 किमी अंतराच्या विरार-सूरत-बडोदा विभागात प्रवासी सेवांसाठी स्वदेशी बनावटीची रेल्वे संरक्षण प्रणाली, ‘कवच 4.0’, कार्यान्वित केली आहे. काल, 30 जानेवारीला गाडी क्रमांक 20907 दादर-भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली ट्रेन ठरली आणि भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

कवच तंत्रज्ञान विरार-सूरत-बडोदा विभागाच्या 344 किमी मार्गावर कार्यान्वित करण्यात आले आहे. या मार्गावर, 49 स्थानके, 57 रेडिओ कम्युनिकेशन टॉवर्स आणि सुमारे 700 किमी ऑप्टिकल फायबर केबलच्या सहाय्याने कवच प्रणाली लागू करण्यात आली आहे. धोक्याच्या सिग्नलवर पुढे जाणे, अतिवेग आणि धडकणे यासारख्या मानवी चुकांमुळे होणारे धोके कमी करण्याकरीता ही कवच प्रणाली उपयोगी ठरते. ‘लेव्हल क्रॉसिंगवर ऑटो-व्हिसलिंग’ म्हणजेच स्वयंचलित शिट्टी वाजवणे आणि केबिनमध्ये सिग्नलच्या स्थितीची जाणीव करून देणे यासारख्या वैशिष्ट्यांद्वारे प्रतिकूल हवामान आणि कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीची सूचना या प्रणालीमुळे मिळते.

पश्चिम रेल्वेने यापूर्वी मागच्या महिन्यात डिसेंबर 2025मध्ये बडोदा-अहमदाबाद विभागात कवच प्रणाली कार्यान्वित केली होती. विरार-बडोदा विभाग कार्यान्वित झाल्यामुळे, आजपर्यंत पश्चिम रेल्वेवर एकूण 435 मार्ग किलोमीटरवर कवच प्रणाली कार्यान्वित झाली आहे. आधीच कार्यान्वित झालेल्या विभागांव्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेच्या इतर अनेक विभागांवर 2667 मार्ग किलोमीटरवर कवच प्रणालीच्या कामासाठी अंदाजे 1435 कोटी रुपये खर्च केला जात आहे. याव्यतिरिक्त 2476 मार्ग किलोमीटरवरील पुढील कामांना मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे त्यांच्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कवर ‘कवच’ प्रणालीचा विस्तार करणार आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content