Homeकल्चर +राज्य बालनाट्य स्पर्धेत...

राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून ‘सत्य जे विलुप्त’ पहिले!

२०व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून चिल्ड्रन्स अकॅडमी, मालाड या संस्थेच्या ‘सत्य जे विलुप्त’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच साई स्पर्श संस्था, ठाणे या संस्थेच्या ‘ये गं ये गं परी!’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक अनिकेत भोईर (सत्य जे विलुप्त), द्वितीय पारितोषिक वैभव उबाळे (ये गं ये गं परी!).

प्रकाशयोजनाः प्रथम पारितोषिक शंतनु साळवी (सत्य जे विलुप्त), द्वितीय पारितोषिक सिद्धेश नांदलस्कर (पॅडल).

नेपथ्य: प्रथम पारितोषिक सिध्दार्थ ठाकूर (ये गं ये गं परी!), द्वितीय पारितोषिक किरवली ग्रामस्थ (पूर्णब्रम्ह).

रंगभूषाः प्रथम पारितोषिक मयुरी जवंजाळ (फुलवा मधुर बहार), द्वितीय पारितोषिक उदय तांगडी (इंडिया घर).

उत्कृष्ट अभिनयः रौप्यपदक गौरांग शमी (सत्य जे विलुप्त) आणि शरयू गोसावी (ये गं ये गं परी!).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रेः स्वरा जाधव (सत्य जे विलुप्त), स्वरा सावंत (पॅडल), अदिती धामणस्कर (कणा), गिरीजा राऊत (अजब लोठ्यांची महान गोष्ट), सई जहागीरदार (फुलवा मधुर बहार), अमोघ डाके (काजवे), वरद पाटील (अजब लोठ्यांची महान गोष्ट), गंधार मुळ्ये (पॅडल), काव्य चौधरी (बुढ्ढी के बाल), देवांश खेंगले (इंडिया घर).

साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे दि. ९ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वैदेही चवरे, संग्राम भालकर आणि शेखर वाघ यांनी काम पाहिले. तसेच समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, तिथी घाडी, मुकुंद जोशी यांनी उत्तमप्रकारे जबाबदारी सांभाळली.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content