Homeपब्लिक फिगर‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ...

‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या उपाध्यक्षपदी रामदास आठवले!

रिपब्लिकन पक्षाचे रष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख जागतिक बौद्ध संघटना असलेल्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कायमस्वरूपी जागतिक मानद उपाध्यक्षपदी आज अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा बँकॉक येथे करण्यात आली. बँकॉक येथे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कार्यकारी परिषदेत आज वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष फॅलोप थेयरी यांनी आठवले यांची वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक मानद उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. यावेळी जगभरातील 60 देशांचे बौद्ध प्रतिनिधी उपस्थित होते. 

वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक कार्यकारी समितीच्या दिवसीय धम्म परिषदेला आज, दि. 21 नोव्हेंबर 2023 रोजी बँकॉक येथील हॉटेलमध्ये प्रारंभ झाला. दि. 21ते 23 नोव्हेंबर 2023पर्यंत ही कार्यकारी परिषद चालणार आहे. आज परिषदेच्या पहिल्या दिवशी  आठवले यांची वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक मानद उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या जागतिक बौद्ध संघटनेला ऐतिहासिक महत्त्व आहे. संपूर्ण जगात वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट प्रमुख बौद्ध संघटना आहे. या संघटनेच्या स्थापना बैठकीला 1950मध्ये बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. दर दोन वर्षांनी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टची जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली जाते. 1956मध्ये डॉ. आंबेडकरांनी काठमांडू, नेपाळ येथे आणि 1954मध्ये रंगून ब्रह्मदेश (म्यानमार) येथे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत सहभाग घेतला होता. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोधिसत्व डॉ. आंबेडकरांनी ऐतिहासिक बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तन घडविले. तो वारसा घेऊन आम्ही भारतात आणि जगभरात बौद्ध धम्माचे काम करीत आहोत. जगाच्या कल्याणासाठी जगाला युद्ध नको तो बुद्ध हवा आहे. त्यामुळे बौद्ध धम्माने दिलेल्या शांती, अहिंसा, सत्य, समता या विचारांचा प्रसार करीत बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी धम्म परिषद आयोजित करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतात मुंबई आणि दिल्ली येथे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टतर्फे जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली जावी, अशी सूचना रामदास आठवले यांनी यावेळी केली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दि. 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर असे 5 दिवस बँकॉक दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सीमा आठवले, पुत्र जित आठवले, युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आहेत.

जगभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीतून जग कसे बाहेर पडून शांतीच्या मार्गावर जाईल; शांती, अहिंसा, मानवता, सत्य, समता, या बुद्ध विचारांचा प्रसार करून जगभर मानव जातीच्या कल्याणासाठी बौद्ध धम्माचा प्रसार वाढवावा याबाबत या आंतराष्ट्रीय बौद्ध परिषदेत विचारविनिमय करण्यात आला. या जागतिक बौद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी यापूर्वीही रामदास आठवले यांची निवड झाली होती. जागतिक उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो. मात्र यंदा आठवले यांना वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे जागतिक मानद उपाध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आला असून या पदासाठी कोणतीही कालमर्यादा ठेवण्यात आलेली नाही.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content