Homeचिट चॅटसचिनभाऊ चषक शालेय...

सचिनभाऊ चषक शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या पुष्कर गोळेचे आव्हान १३-९ असे संपुष्टात आणले. दमदार प्रारंभासह ९-० अशी आघाडी घेणाऱ्या पुष्कर गोळेला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

परळ येथील वातानुकुलीन आरएमएमएस सभागृहामधील उपांत्य सामन्यात पुष्कर गोळेने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतचा तर प्रसन्न गोळेने शारदाश्रम विद्यामंदिर-दादरच्या सोहम जाधवचा पराभव केला. स्पर्धेमध्ये आर्यन राऊत व सोहम जाधवने उपांत्य उपविजेतेपद मिळविले तर‌ पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या निधी सावंत व अद्वैत पालांडे, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, एसव्हीएस इंग्लिश स्कूलचा समीर कांबळे यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद तर अमेय जंगम, गौरांग मांजरेकर, शिवांश मोरे, प्रेक्षा जैन, वेदांत पाटणकर, तीर्थ ठक्कर, साईराज साखरकर, उमैर पठाण यांनी उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद पटकावले.

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, जैतापूर आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४० कॅरमपटूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. शालेय खेळाडूंना मार्गदर्शनासह प्रोत्साहन देण्यासाठी १ मे रोजी होणाऱ्या मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या ४ विजेत्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर, सिध्दीविनायक प्रसाद व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content