Homeबॅक पेजकारगिल विजय दिनानिमित्त...

कारगिल विजय दिनानिमित्त टपाल तिकीट जारी

कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त गोवा टपाल विभागाने शुक्रवारी पणजी येथील मुख्य टपाल कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) आणि टपाल सेवा (गोवा प्रदेश), पणजीचे संचालक रमेश पी. पाटील यांच्या हस्ते विशेष तिकीट जारी केले.

कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) यांनी आपल्या भाषणात कारगिल युद्धात भारतीय नौदलाने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. तसेच त्यांनी युद्धादरम्यानचे आपले विचार आणि अनुभवही सामायिक केले. गोवा विभाग, पणजी येथील टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक एस. व्ही. एल.

एन. राव, टपाल सेवा-l, गोवा प्रदेश, पणजीचे सहाय्यक संचालक संजय देसाई, गोवास्थित राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे सेवानिवृत्त वैज्ञानिक डॉ. एम. आर. रमेश कुमार आणि टपाल विभागाचे कर्मचारी या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.

डॉ. एम. आर. रमेश कुमार हे एक टपाल तिकीट संग्राहकदेखील आहेत. त्यांनी कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त पणजी टपाल मुख्यालयाच्या समोर फिलाटली ब्युरो येथे टपाल तिकिटांचे वन-फ्रेम प्रदर्शन आणि ‘ऑलिम्पिक विश्वातील एक फिलाटेलिक प्रवास’ या संकल्पनेवर चार फ्रेमचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 11 ऑगस्ट 2024पर्यंत लोकांसाठी खुले राहील.

Continue reading

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

राज्यातील साखर आयुक्तपदातील सावळागोंधळ सुरूच आहे. साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांचीही सहा महिन्यातच बदली करण्यात आली आहे. काल उशिरा जारी आदेशानुसार, त्यांची मुंबईत कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी राज्याचा ऊसगाळप हंगाम सुरू असतानाच फेब्रुवारीमध्ये...

शनिवारपासून मुंबईतली मोनोरेल तात्पुरती बंद!

मुंबई मोनोरेल भविष्यासाठी अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येत्या 20 सप्टेंबर 2025पासून मोनोरेलची सेवा काही काळासाठी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात, नवीन "रोलिंग स्टॉक" (रॅक), प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग...

1 ऑक्टोबरपासून रेल्वे बुकिंगसाठी पहिल्या 15 मिनिटांत आधार अनिवार्य

आरक्षण प्रणालीचा लाभ सर्वप्रथम सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावा आणि गैरवापर करणाऱ्या घटकांकडून होणारा वापर टाळ्याकरीता येत्या 1 ऑक्टोबर 2025पासून, रेल्वेच्या सामान्य आरक्षणाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 मिनिटांत, आरक्षित सामान्य तिकीट फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच केले जाऊ शकेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम...
Skip to content