Homeबॅक पेजकारगिल विजय दिनानिमित्त...

कारगिल विजय दिनानिमित्त टपाल तिकीट जारी

कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त गोवा टपाल विभागाने शुक्रवारी पणजी येथील मुख्य टपाल कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) आणि टपाल सेवा (गोवा प्रदेश), पणजीचे संचालक रमेश पी. पाटील यांच्या हस्ते विशेष तिकीट जारी केले.

कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) यांनी आपल्या भाषणात कारगिल युद्धात भारतीय नौदलाने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. तसेच त्यांनी युद्धादरम्यानचे आपले विचार आणि अनुभवही सामायिक केले. गोवा विभाग, पणजी येथील टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक एस. व्ही. एल.

एन. राव, टपाल सेवा-l, गोवा प्रदेश, पणजीचे सहाय्यक संचालक संजय देसाई, गोवास्थित राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे सेवानिवृत्त वैज्ञानिक डॉ. एम. आर. रमेश कुमार आणि टपाल विभागाचे कर्मचारी या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.

डॉ. एम. आर. रमेश कुमार हे एक टपाल तिकीट संग्राहकदेखील आहेत. त्यांनी कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त पणजी टपाल मुख्यालयाच्या समोर फिलाटली ब्युरो येथे टपाल तिकिटांचे वन-फ्रेम प्रदर्शन आणि ‘ऑलिम्पिक विश्वातील एक फिलाटेलिक प्रवास’ या संकल्पनेवर चार फ्रेमचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 11 ऑगस्ट 2024पर्यंत लोकांसाठी खुले राहील.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content