Homeकल्चर +'पाहुणे येत आहेत...

‘पाहुणे येत आहेत पोरी..’ सोशल मीडियावर हिट

लग्नासाठी स्थळ पाहायला जाण्याची लगबग, धावपळ, काळजी व्यक्त करणारं “पाहुणे येत आहेत पोरी..” हे स्थळ चित्रपटातलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या टीजरला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अत्यंत श्रवणीय गाणं दाद मिळवत आहे. “स्थळ” हा चित्रपट महिला दिनाचे औचित्य साधत येत्या ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून जयंत सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जयंत सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. अरेंज्ड मॅरेज, या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट “स्थळ” या चित्रपटातून दाखवली जाणार आहे.

“पाहुणे येत आहेत पोरी..” हे गाणं मीराबाई येते आणि आशिष नारखेडकर यांनी गायलं आहे. जयंत सोमलकर यांच्या शब्दांना माधव अगरवाल यांनी स्वरसाज चढवला आहे. हार्मोनियमवरची सूरावट आणि नेमका ठेका यांनी गाण्यातल्या शब्दांना आणखी रंजक केलं आहे. चित्रपटात पारंपरिकपणे गायिकांकडून गाणी गाऊन घेतली जातात. मात्र “स्थळ” चित्रपटातलं हे गाणं गाण्याची आवड असलेल्या, पण व्यावसायिक नसलेल्या मीराबाई या चंद्रपूरनजीकच्या महिलेने गायलं आहे.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content