Homeपब्लिक फिगरनवनवीन धोक्यांना रोखण्याची...

नवनवीन धोक्यांना रोखण्याची ताकद आहे आपल्या नौदलात!

भारताला सागरी दहशतवादापासून उद्भवणारे नवीन धोके असून समुद्रामध्ये होणारी चाचेगिरी आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी नवनवीन आव्हाने समोर येत असली तरीही त्यांना निष्प्रभ करण्याची भारतीय नौदलात ताकद आहे, असे ठाम मत नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख, व्हाईस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी शुक्रवारी मांडले.

भारतीय नौदल दरवर्षी 04 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करते. सन 1971च्या भारत-पाक संघर्षादरम्यान, भारतीय नौदलाच्या नौकांनी कराची बंदरात शत्रूंच्या नौकांवर प्राणघातक क्षेपणास्त्र हल्ला केला. ज्यामुळे बंदर पेटले आणि शत्रूच्या अनेक युद्धनौका नष्ट झाल्या होत्या. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा नौदल दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत, व्हाइस अ‍ॅडमिरल त्रिपाठी यांनी नौदल दिनानिमित्त सिंधुदूर्ग येथे भारतीय नौदलाच्या आगामी ऑपरेशन डेमो, किनारी सुरक्षा, सायबर सुरक्षा, अग्निवीर, समुद्रातून अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धचा लढा, नौदलातील महिलांसाठी भूमिका आणि जबाबदाऱ्या, स्वदेशी युद्धनौकांचे उत्पादन आदी विविध बाबींवर स्पष्टता केली.

भारतीय समुद्रात शत्रूंकडून होणारा कोणताही लष्करी हल्ला रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सागरी दहशतवादापासून उद्भवणाऱ्या नवीन धोक्यांमुळे आणि खोल समुद्रांमध्ये होणारी चाचेगिरी आणि नार्को तस्करीशी लढणे ही नवीन आव्हाने आहेत. राष्ट्रीय सागरी मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी समुद्रातील आव्हानांना तोंड देण्याची आमची तयारी आहे, याचा त्रिपाठी यांनी ‘आयएनएस चेन्नई’ या युद्धनौकेवर माध्यमांशी बोलताना पुनरुच्चार केला.

भारतीय नौदलाला भारतीय शिपयार्ड्समध्ये गेल्या नऊ वर्षांत 21 युद्धनौका आणि पाच पाणबुड्या तयार केल्याचा अभिमान आहे. येथील शिपयार्ड्समध्ये निमार्णाधीन 65 जहाजे आणि पाणबुड्यांसह 1.15 कोटी रुपयांचे 12 नौकांचे बांधणी करारही पूर्ण केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

भारतीय नौदलाची आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या सागरी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात नौदल निर्णायक आहे. आम्ही आमच्या सागरी क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या गैर-राज्य घटकांच्या धमक्यांच्या ट्रेंड आणि पॅटर्नचे निरीक्षण करत आहोत, जे दररोज खेळले जात आहेत आणि चाचणीचीही मयार्दा आहे. भारतीय नौदल समुद्रावरून होणारे कोणतेही लष्करी साहस आणि आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे व आमच्या राष्ट्रीय हितसंबंधांचे उल्लंघन रोखण्यासाठी सज्ज आणि सतर्क आहे, असेही पश्चिम नौदल कमांड प्रमुख म्हणाले.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content