Homeएनसर्कलआता रेल्वे आणि...

आता रेल्वे आणि दूरसंचार विभाग एकत्रित काढणार हरवलेल्या मोबाईलचा माग

रेल्वे प्रवाशांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करणे, त्यांचा माग काढणे आणि ते परत मिळवण्यासाठी दूरसंचार विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यात भागीदारी झाली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईल फोनच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा दलासोबत ही भागीदारी केली आहे.

या भागीदारीअंतर्गत दूरसंचार विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे प्रवाशांचे हरवलेले वा चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून ते परत मिळवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतील. यादृष्टीने रेल मदत (Rail Madad) हे अॅप आता दूरसंचार विभागाच्या संचार साथी (Sanchar Saathi) या व्यासपीठासोबत जोडले गेले आहे.

मोबाईल

दूरसंचार विभागाच्या संचार साथी या व्यासपीठाअंतर्गत तक्रार केलेले चोरीला गेलेले/हरवलेले मोबाईल फोन ब्लॉक करण्यासाठी म्हणजेच वापरासाठी प्रतिबंधित करण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर रेल मदत अॅपच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान असलेल्या तक्रारी किंवा समस्यांचे निराकरण करून घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता या दिशेने काम करताना संचार साथी पोर्टलवर रेल्वे सुरक्षा दलाची 17 क्षेत्र आणि 70हून अधिक विभागांना जोडून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता प्रवासी रेल मदत अॅपवर हरवलेल्या वा चोरी गेलेल्या मोबाईल फोनबाबत तक्रार नोंदवू शकतील. या तक्रारीचे तपशील संचार साथी पोर्टलवर पाठवले जातील. यामुळे हरवलेला/चोरी गेलेला मोबाईल फोन ब्लॉक करून त्याचा गैरवापर रोखण्यात मदत होणार आहे. याशिवाय या मोबाईल उपकरणांचा मागोवा घेणे आणि त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाला त्याबाबतची सूचना जारी करणे शक्य होईल.

याव्यतिरिक्त, दूरसंचार विभाग नागरिकांना संचार साथीच्या CEIR मॉड्यूलचा वापर करून हरवलेले वा चोरीला गेलेल्या मोबाईल फोनची तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे दूरसंचार सेवा अधिक सुरक्षित आणि वापरकर्त्यांना अनुकूल बनवण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्नांना चालना मिळू शकणार आहे. नागरिकांनी संचार साथी अॅपचा वापर करून सायबर गुन्हे आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दूरसंचार संसाधनांच्या गैरवापर होत असल्याबाबतच्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहनही दूरसंचार विभागाने केले आहे. सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतर्गत, ग्राहक हितांचे रक्षण करण्यासाठी दूरसंचार विभाग कठोर देखरेख आणि तातडीच्या कारवाईसाठी प्रयत्नशील आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content