Homeपब्लिक फिगरराज्यात सध्या सरकार...

राज्यात सध्या सरकार नाही तर टोळीचे राज्य!

राज्यात सध्या सरकार नाही, तर टोळीचे राज्य आहे. इतिहासातील सर्वात पळपुटे, डरपोक आणि खंडणीखोर असे हे सरकार आहे. या सरकारमध्ये विकासकामांसाठी कुणी भांडत नाही, तर टक्केवारीसाठी भांडतात, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात लाखो तरुण त्रस्त आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना हे ठावूक नसते की, साऱ्या परीक्षा मंत्रालयात आधीच मॅनेज झालेल्या आहेत. ज्या न्यासा, जीए सॉफ्टवेअरने घोळ केले, त्यांनाच परीक्षांची कामे दिली जात आहेत. भ्रष्टाचाराच्या फॅक्टरीतील हा एक प्रकार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

विद्यापीठ कायदा अंधाऱ्या रात्रीत पळपुटेपणा करून पारित करण्यात आला. जी विद्यापीठे शिक्षणाची मंदिरे आहेत, त्यांना राजकारणाचे आणि भ्रष्टाचाराचे अड्डे बनवायचे आहेत. या कायद्यातून प्रशासकीय आणि शैक्षणिक अधिकार मंत्र्यांनी आपल्याकडे घेतले आहेत. असा प्रकार देशात कुठेही नाही. विद्यापीठांना सरकारी महामंडळे करण्याचा घाट घातला जात आहे. केवळ पदव्या विकणारे ते केंद्र बनून राहतील. अनेक ‘कोहचाडे‘ यामुळे जन्माला येतील. या कायद्याने सिनेटचे संचालन मंत्री करतील. शब्द वाईट आहे, पण राज्यातील कुलगुरूंना बाबू करणारा हा कायदा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपण्याचे काम आपल्याला करावे लागेल. आज आपण गप्प बसलो तर येणाऱ्या अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. म्हणूनच एका मोठ्या संघर्षाला आपल्याला तयार राहावे लागेल. टोकाच्या लढाईसाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आता सज्ज झाले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content