Homeडेली पल्सयंदाच्या प्रजासत्ताकदिन समारोहात...

यंदाच्या प्रजासत्ताकदिन समारोहात एनसीसीच्या मुली विक्रमी संख्येत

राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या समारोहात सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या कॅडेट्सना त्याकरीता खास सराव करावा लागतो. यासाठी सध्या चालू असलेल्या शिबिरात यंदा सहभागी होणाऱ्या 2,361 कॅडेट्सपैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग वाढला आहे. इतकेच नव्हे तर युवक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 18 मित्रराष्ट्रांमधले 135 छात्रही यात सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिरात 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे, असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्ट. जनरल गुरबीरपाल सिंग यांनी काल दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 18 मित्रराष्ट्रांमधले सुमारे 135 छात्र शिबिरात भाग घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशात एनसीसी कॅडेट्सची संख्याही 17 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढली असून त्यात 40% मुली आहेत, असे राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकांनी नमूद केले.

या शिबिरात सहभागी होणारे छात्र अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि प्रशिक्षणविषयक स्पर्धांमध्ये भाग घेतील. भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणे तसेच छात्रांच्या वैयक्तिक गुणांना अधिक वाव देऊन त्यांची मूल्यप्रणाली बळकट करणे हा या शिबिराचा हेतू आहे. उपराष्ट्रपती, संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांच्यासह अनेक मान्यवर या शिबिराला भेट देणार आहेत. 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्यपथावरील प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात एनसीसीची ही तुकडीदेखील सहभागी होईल. दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला पंतप्रधानांच्या रॅलीने या उपक्रमांचा समारोप होईल, असेही सिंग यांनी नमूद केले.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content