Homeकल्चर +दादर-माटुंगा केंद्रात रंगला...

दादर-माटुंगा केंद्रात रंगला संगीत नाट्यमहोत्सव

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली १६ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे.

संगीत अमृतवेल हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित, आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर जोशी दिग्दर्शित, राम तांबे यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या संगाती नाटकाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी निर्मित सं. ययाती आणि देवयानी, हे वि. वा. शिरवाडकर लिखित आणि गणेश जोशी दिग्दर्शित, नाटक सादर झाले. जितेंद्र अभिषेकी यांनी मूळ संगीत दिलेल्या या नाटकाच्या संगीत मार्गदर्शक स्मिता करंदीकर आहेत.

संगीत नाट्यमहोत्सवाचा समारोप विद्याधर गोखले नाट्य प्रतिष्ठान निर्मित सं. बावनखणी, हे विद्याधर गोखले लिखित आणि श्रीकांत दादरकर दिग्दर्शित नाटकाने झाला. नाटकाचे संगीतकार यशवंत देव असून संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर यांचे आहे. नृत्य मार्गदर्शन स्मृती तळपदे यांचे असून निर्मिती प्रमुख शुभदा दादरकर आहेत.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात कलाकारांनी अभिनयाची बाजूही चांगली सांभाळली. मुळात लोकप्रिय असलेल्या नाटकांनी बहार केली. जुनेजाणते कलाकार, अप्रतिम गाणी यांनी दोन्ही प्रयोग चांगलेच रंगले. गाण्यांना वन्स मोअरही मिळाले.  

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content