Homeकल्चर +दादर-माटुंगा केंद्रात रंगला...

दादर-माटुंगा केंद्रात रंगला संगीत नाट्यमहोत्सव

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली १६ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे.

संगीत अमृतवेल हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित, आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर जोशी दिग्दर्शित, राम तांबे यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या संगाती नाटकाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी निर्मित सं. ययाती आणि देवयानी, हे वि. वा. शिरवाडकर लिखित आणि गणेश जोशी दिग्दर्शित, नाटक सादर झाले. जितेंद्र अभिषेकी यांनी मूळ संगीत दिलेल्या या नाटकाच्या संगीत मार्गदर्शक स्मिता करंदीकर आहेत.

संगीत नाट्यमहोत्सवाचा समारोप विद्याधर गोखले नाट्य प्रतिष्ठान निर्मित सं. बावनखणी, हे विद्याधर गोखले लिखित आणि श्रीकांत दादरकर दिग्दर्शित नाटकाने झाला. नाटकाचे संगीतकार यशवंत देव असून संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर यांचे आहे. नृत्य मार्गदर्शन स्मृती तळपदे यांचे असून निर्मिती प्रमुख शुभदा दादरकर आहेत.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात कलाकारांनी अभिनयाची बाजूही चांगली सांभाळली. मुळात लोकप्रिय असलेल्या नाटकांनी बहार केली. जुनेजाणते कलाकार, अप्रतिम गाणी यांनी दोन्ही प्रयोग चांगलेच रंगले. गाण्यांना वन्स मोअरही मिळाले.  

Continue reading

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन...

भाग घ्या हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेत

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने 'डिस्कवर, परफॉर्म, राइज इन खयाल', या थीमखाली हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ ते ३० वर्षे वयोगटातील कलाकारांसाठी असून, येत्या २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृह,...

राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे दमानियांचे षडयंत्र!

कृषी साहित्यखरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे नाना प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, यामध्ये कृषीखरेदीबाबत सुरुवातीला उच्च न्यायालयात ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनी खोटे पुरावे दिले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाची बदनामी केली म्हणून उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला. त्यांनी...
Skip to content