Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिका आयुक्तांच्या...

मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचे कर 14 वर्षांपासून थकित!

मुंबई महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलक विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली असतानाच मुंबईच्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्याची मागील 14 वर्षांच्या विविध करांची 4.56 लाखांची थकबाकी आजही थकलेलीच आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. गलगलींनी आयुक्त कार्यालयाकडे 29 डिसेंबर 2023 रोजी अर्ज करत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी आपल्या बंगल्यावर वीजसुविधांसाठी केलेल्या खर्चाबाबतचा मागील 5 वर्षांची माहिती माहिती मागितली होती. ही माहिती महिन्यामुसार एकूण वीज आकार, वापरलेले युनिट अशा स्वरूपात मागितली गेली होती.

मुंबई

अनिल गलगली यांचा अर्ज आयुक्त कार्यालयाने डी विभागाच्या जलखात्याकडे हस्तांतरित केला. जल खात्याने अर्ज करनिर्धारक व संकलक खात्याकडे हस्तांतरित केला. नंतर गलगलींना 31 मार्च 2024पर्यंतची माहिती देण्यात आली. 1 एप्रिल 2010पासून 31 मार्च 2023पर्यंतची थकबाकी 3.89 लाख होती. तसेच 1 एप्रिल 2023पासून 31 मार्च 2024पर्यंतचे चालू बिल देयक 67, 278 इतके आहे. यात सर्वसाधारण तसेच जल कराचा समावेश आहे. विशेष म्हणजे तेथे जलमापकविरहित जलजोडणी आहे.

अनिल गलगली यांच्या मते, जलमापक लावणे आवश्यक आहे. आयुक्त असो किंवा सामान्य नागरिक प्रत्येकांनी वेळेवर कर अदा करणेही आवश्यक आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content