Homeपब्लिक फिगरपर्वतमाला परियोजनेखाली येत्या...

पर्वतमाला परियोजनेखाली येत्या ५ वर्षांत सव्वा लाख कोटींचे प्रकल्प!

राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम, “पर्वतमाला परियोजने” अंतर्गत येत्या पाच वर्षांत 1.25 लाख कोटी रुपये खर्चाचे 200हून अधिक प्रकल्प पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नवी दिल्लीत ‘रोपवे: परिषद आणि प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी गडकरी बोलत होते. एकूण प्रकल्प खर्च कमी करून रोपवे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवणे आणि देशात रोपवेचे जाळे विकसित करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देणे याला आपले सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

डोंगराळ भागात पर्यटनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच, शहरी सार्वजनिक वाहतुकीची मोठी क्षमता रोपवेमध्ये आहे असे सांगत सुरक्षिततेशी तडजोड न करता स्वदेशी आणि किफायतशीर उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. रोपवेमध्ये देशातील पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर सकारात्मक परिणाम करण्याची अपार क्षमता आहे, याकडे केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने, भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. आज आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचे आपले उद्दिष्ट आहे, असे गडकरी यांनी सांगितले. कालबद्ध, किफायतशीर, दर्जेदार आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे नागरिकांचे ‘जीवन सुसह्य’ आणि प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित होतो, असे त्यांनी सांगितले. “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत रोपवेसाठीच्या घटकांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन विद्यमान धोरणे आणि संहितेचे मानकीकरण करणे आणि रोपवे उद्योगात परिवर्तन करणे याला प्राधान्य असल्याचे गडकरी म्हणाले.

विविध भारतीय आणि जागतिक उत्पादक, तंत्रज्ञान प्रदाते, सवलती देणारे आणि पायाभूत सुविधा विकासक यांच्यातील उद्योग सहकार्य, सक्षम करणे हा ‘रोपवे: परिषद आणि  प्रदर्शन’चा उद्देश होता. या कार्यक्रमाने ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी आणि रोपवे घटकांच्या स्थानिकीकरणासाठी मार्गदर्शक आराखडा विकसित करण्यासाठी उद्योगांच्या विचारविनिमयासातही एक समान व्यासपीठ देखील प्रदान केले. रोपवे उद्योग क्षेत्र सुधारण्यासाठी आणि भारतात सार्वजनिक खाजगी भागीदारी वाढवताना सुरक्षित आणि परवडणारी रोपवे प्रणाली तयार करण्यासाठी उद्योग तज्ज्ञांशी विविध चर्चासत्रेदेखील या परिषदेत आयोजित करण्यात आली होती.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content