Friday, March 28, 2025
Homeपब्लिक फिगरपर्वतमाला परियोजनेखाली येत्या...

पर्वतमाला परियोजनेखाली येत्या ५ वर्षांत सव्वा लाख कोटींचे प्रकल्प!

राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम, “पर्वतमाला परियोजने” अंतर्गत येत्या पाच वर्षांत 1.25 लाख कोटी रुपये खर्चाचे 200हून अधिक प्रकल्प पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

नवी दिल्लीत ‘रोपवे: परिषद आणि प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी गडकरी बोलत होते. एकूण प्रकल्प खर्च कमी करून रोपवे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवणे आणि देशात रोपवेचे जाळे विकसित करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देणे याला आपले सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

डोंगराळ भागात पर्यटनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच, शहरी सार्वजनिक वाहतुकीची मोठी क्षमता रोपवेमध्ये आहे असे सांगत सुरक्षिततेशी तडजोड न करता स्वदेशी आणि किफायतशीर उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. रोपवेमध्ये देशातील पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर सकारात्मक परिणाम करण्याची अपार क्षमता आहे, याकडे केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने, भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. आज आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याचे आपले उद्दिष्ट आहे, असे गडकरी यांनी सांगितले. कालबद्ध, किफायतशीर, दर्जेदार आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे नागरिकांचे ‘जीवन सुसह्य’ आणि प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित होतो, असे त्यांनी सांगितले. “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत रोपवेसाठीच्या घटकांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन विद्यमान धोरणे आणि संहितेचे मानकीकरण करणे आणि रोपवे उद्योगात परिवर्तन करणे याला प्राधान्य असल्याचे गडकरी म्हणाले.

विविध भारतीय आणि जागतिक उत्पादक, तंत्रज्ञान प्रदाते, सवलती देणारे आणि पायाभूत सुविधा विकासक यांच्यातील उद्योग सहकार्य, सक्षम करणे हा ‘रोपवे: परिषद आणि  प्रदर्शन’चा उद्देश होता. या कार्यक्रमाने ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी आणि रोपवे घटकांच्या स्थानिकीकरणासाठी मार्गदर्शक आराखडा विकसित करण्यासाठी उद्योगांच्या विचारविनिमयासातही एक समान व्यासपीठ देखील प्रदान केले. रोपवे उद्योग क्षेत्र सुधारण्यासाठी आणि भारतात सार्वजनिक खाजगी भागीदारी वाढवताना सुरक्षित आणि परवडणारी रोपवे प्रणाली तयार करण्यासाठी उद्योग तज्ज्ञांशी विविध चर्चासत्रेदेखील या परिषदेत आयोजित करण्यात आली होती.

Continue reading

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा...

कांदा होणार आणखी स्वस्त! निर्यातशुल्क हटवले!!

महाराष्ट्रात लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठेत या महिन्यापासून कांद्याची आवक वाढली आहे, ज्यामुळे किंमती घसरल्या आहेत. कांदा स्वस्त झाला आहे. 21 मार्च 2025 रोजी लासलगाव आणि पिंपळगाव येथे कांद्याचा भाव अनुक्रमे 1330 आणि 1325 रुपये प्रति क्विंटल होता. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी कांद्याचे रब्बी उत्पादन 227 लाख मेट्रिक...

सचिनभाऊ चषक शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्नने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या...
Skip to content