Homeपब्लिक फिगरनिसर्ग वाचवण्यासाठी अनेक...

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखणं कसं आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी सह्याद्री देवराई, या त्यांच्या संस्थेमार्फत होत असलेल्या वृक्षारोपणाच्या कार्याची माहिती दिली.

निसर्ग

श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईतल्या गोरेगाव येथील नंदादीप शाळेच्या कलाघर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या सहाय्यक आयुक्त डॉ. विनया जंगले उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकरही यावेळी उपस्थित होते.

डॉ. विनया जंगले यांनी वन्यजीवांच्या विश्वातील अनुभव कथन करताना पुस्तकातील संवेदनशीलतेचे कौतुक केले. विशेष म्हणजे यात लेखकाने निसर्ग आणि व्यक्ती यांचा सुरेख संगम साधला आहे, असे त्यांनी नमूद केले. शब्दांच्या रानसावल्या, केवळ कागदावरील नोंदी नसून तो निसर्गाशी साधलेला एक जिवंत संवाद आहे, अशा शब्दांत प्रा. राजेंद्र केरकर यांनी लेखकाचा गौरव केला. मराठी भाषेतल्या निसर्ग साहित्यात आजवर अनेक मातब्बर लेखकांनी आपापले अनुभव मांडले आहेत. त्यांचा वारसा लिखित स्वरुपात पुढे चालू राहवा. यात आपलंही छोटे योगदान असावं म्हणून हे निसर्ग अनुभवांचे लिखाण वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मनोगत लेखकाने व्यक्त केले. हे पुस्तक ब्रॉडवे बुक पब्लिशिंग हाऊस, गोवा यांनी छापून प्रसिद्ध केले असून त्याची किंमत ४०० रूपये आहे.

Continue reading

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...
Skip to content