Homeमाय व्हॉईसमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशाबाजांचा...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नशाबाजांचा सुळसुळाट!

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादवसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा शाल-श्रीफळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य केले जाते, अशी टीका राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज एका ट्विटद्वारे केली.

प्रसिद्ध युट्यूब ब्लॉगर आणि बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादव आणि इतर काही जणांविरूद्ध उत्तर प्रदेशातल्या पोलिसांनी रेव्ह पार्टीत सापांचे विष पुरवल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याने स्वतः याचा इन्कार केला आहे. यात एक टक्का तथ्य असले तरी सर्व जबाबदारी स्वीकारायला आपण तयार असल्याचे त्याने म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याबरोबरची त्याची छायाचित्रे सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरचे एल्विशचे छायाचित्र समोर आल्यानंतर वडेट्टीवार यांनी असेच एक छायाचित्र देत ट्विट केले.

गणपती पूजननिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या एल्विश यादवला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते त्याच्याविरोधात सापाच्या विषापासून ड्रग्स बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्सचे सेवन, विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादवसारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

आधीच राज्यात ड्रग्जचे कारखाने सापडत आहेत. ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षावर नशाबाज आरती करतो. हे आहे महायुती सरकार… असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

40 पैकी 35 दुष्काळी तालुके सत्ताधारी आमदारांचे

सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना. दुष्काळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना खुश करण्यासाठी आहे का?, असा सवालही वडेट्टीवार यांनी आणखी एका ट्विटद्वारे केला आहे.

राज्यात चाळीस तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा दुष्काळ जाहीर करत असताना सरकार राजकारण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास 33 ते 35 तालुक्यांचे आमदार सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला आहे. सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनेशी हा खेळ सुरू असून दुष्काळ जाहीर करताना सरकारने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दुष्काळ जाहीर केला की, सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी हा दुष्काळ जाहीर केला, असा सवाल त्यांनी केला आहे.

नशाबाजांचा

सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडून राजकारण केले आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेला राजकीय भेदभाव अत्यंत खेदजनक आहे. सरकारने किमान  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये. परंतु सरकारने तीन पक्षाच्या आमदारांना खुश ठेवण्यासाठी घेतलेले हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना आहे. उदाहरणार्थ जत तालुक्यात टँकर सुरू असून पाण्याची प्रचंड टंचाई आहे. पण यासारख्या अनेक तालुक्यांना डावलून सरकारने हा जुलमी निर्णय घेतला आहे. या रोषातूनच जतमध्ये गाड्यांची तोडफोड केल्याचे वृत्त समोर आले आहे. सरकारचे शेतकऱ्यांवरचे बेगडी प्रेम आता उघड झाले आहे.

पीकविमा कंपन्यांचे लाड पुरविण्याचे सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संकटात टाकणारे आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी भरडणार असून पीकविमा कंपन्यांचाच फायदा होणार आहे. सरकारने राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचे जगणे अवघड होणार आहे. राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला न्याय द्यावा, अशी मागणी आम्ही वारंवार केली. परंतु संवेदना गमावलेल्या सरकारने शेवटी राजकारण केलेच, अशी टीकाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content