Homeन्यूज ॲट अ ग्लांसवाद निर्माण करून...

वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास!

पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायमूर्ती तसेच न्यायव्यवस्था याच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं ही कुणाल कामराची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांना लक्ष्य करत खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न त्याने केला. कामराच्या हास्यव्यंग्यावर टिप्पणी करताना फडणवीस म्हणाले की, कामराला माहीत हवे की, राज्यात कोण खुद्दार आणि कोण गद्दार! हे २०२४ च्या निवडणुकीतून राज्यातील जनतेने ठरवले आणि हिन्दूहृदयसम्राट ठाकरे यांच्या विचाराचा वारसा कुणाकडे आहे, हेही जनतेने ठरवले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांच्यावर कॉमेडी करण्याच्या नावाखाली अपमानास्पद व्यंग्य करून अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करणाऱ्या कुणाल कामरा याच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेur मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले. त्याआधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या हौद्यात जमा होऊन गदारोळ केला आणि कामराविरुद्ध कारवाईचा आग्रह धरल्यानंतर पाच मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

कामरा याने एकनाथ शिन्दे यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल सभागृहात अर्जुन खोतकर यांनी मुद्दा उपस्थित केला. सभागृहाबाहेरही कामरा याच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. मख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हास्यव्यंग्य किंवा अभिव्यक्ती याचा पुरस्कार करणारे आपण सर्व आहोत आणि अशा व्यंग्यातून त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा आपण प्रयत्न केलेला नाही. पण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असेल तर ते मान्य केले जाणार नाही. कामरा यांच्या समर्थनासाठी उभे राहिलेल्या विरोधी पक्षातील काही सदस्यांवर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कामरा याची शिन्दे यांच्यावरील टिप्पणी करत खिल्ली उडवणारी कविता प्रसारित झाली आणि विरोधकांमधील एकाने ट्विट केले, एकाची क्लिप आली. मग दुसऱ्याची क्लिप आली. मग प्रश्न असा येतो की या कामराला सुपारी दिली गेली होती का?

फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी जे छोटे लाल संविधान घेऊन फिरतात, त्याच्याबरोबरचा फोटो या कामराने ट्विट केला आहे. संविधानाने प्रत्येकाला दिलेले स्वातंत्र्य अमर्याद नाही. तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता तेव्हा ते स्वातंत्र्य मर्यादित होते. त्याने अपमानजनक शब्द वापरले आहेत. त्याने माझ्यावर किंवा शिन्देसाहेबांवर कविता करावी ती आम्हीही ऐकू. पण अपमानजनक काम सुपारी घेऊन केले तर कारवाई केलीच जाईल. त्याच्यावर कारवाई केली की मग संविधानाचे स्वातंत्र्य गेले असे म्हणत छात्या बडवू नका. विनाकरण प्रसिद्धीसाठी सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल, कारण महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचे काम करणारे हे लोक आहेत. त्याचपद्धतीने त्या रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांवर घाणेरडे शब्द वापरले तर योग्य नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. सध्या लेफ्ट, लिबरल यांचे उद्देश एकच आहेत आणि ते म्हणजे देशातील मानके, संस्थांवरचा विश्वास उडवणे. पण त्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये म्हणून कामरा याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content