Homeकल्चर +'देवमाणूस' किरण गायकवाड...

‘देवमाणूस’ किरण गायकवाड आता दिग्दर्शक..

“देवमाणूस”, “लागिरं झालं जी”, अशा गाजलेल्या मालिका तर “चौक”, “फकाट”, “डंका हरी नामचा” अशा प्रदर्शित झालेल्या व आगामी “नाद”, “आंबट शौकीन” या आगामी चित्रपटांतून अभिनेता म्हणून चमकलेला अभिनेता किरण गायकवाड आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘”एफ.आय.आर. नंबर 469″ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे दिग्दर्शन किरण गायकवाड करत आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई येथे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अगरवाल यांनी ‘”एफ.आय.आर. नंबर 469″ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अर्चना भुतडा सहनिर्मात्या आहेत. अभिनेता प्रसाद ओक, नचिकेत पूर्णपात्रे, अभिनेत्री अमृता धोंगडे या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका

आपल्याला पाहायला मिळणार आहेत. योगेश कोळी छायांकन, विजय गावंडे संगीत दिग्दर्शन, योगेश इंगळे कला दिग्दर्शक तर अजिंक्य फाळके कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे.

कसदार अभिनेता म्हणून किरण गायकवाडने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने निवडलेल्या मालिका, चित्रपटांतून त्याचा अभिनेता म्हणून असलेला कल दिसतो. त्यामुळे आता दिग्दर्शन म्हणून पदार्पण करताना त्याने चित्रपटासाठी निवडलेला विषय काय, याबाबत कुतूहल आहे. त्याशिवाय ‘”एफ.आय.आर. नंबर 469″ या नावातून हे कथानक पोलिस तपासाचं असल्याचा अंदाज बांधता येत असला तरी विषय समजून घेण्यासाठी चित्रपटाचा ट्रेलर येईपर्यंत प्रेक्षकांना थांबावं लागणार आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content