Homeचिट चॅटमलबार हिल बॅडमिंटनः...

मलबार हिल बॅडमिंटनः काव्या, अभिमन्यू, अनुश्री, विवान, रुद्रा, आदित्य, ओम विजेते

मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने मुंबईतल्या मलबार हिल क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या मुला-मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत काव्या कुमार, अभिमन्यू शेटे, अनुश्री मोडलींबकर, विवान वायंगणकर, रुद्रा गावडे, आदित्य पडवळ, ओम दाबेकर यांनी विजेते पदाचा मान मिळवला.

या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार येथील अकादमीचे सदस्य असलेले खेळाडू सहभागी झाले होते. अकादमीची ही ११७वी स्पर्धा होती. मलबार हिल क्लबचे सोहम दारुवाला, भैरव सेठ, बॉम्बे  जिमखान्याचे कुणाल राव यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. योनेक्स, मलबार हिल क्लबचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला मिळाले. अकादमीचे संचालक मनोहर गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकालः

मुली:

११ वर्षांंखालील: काव्या कुमार वि. वि. आर्या जोशी, १३ वर्षांंखालील: अनुश्री मोडलींबकर वि. वि. तनया राणे, १५ वर्षांंखालील: रुद्रा गावडे वि. वि. सनया ठक्कर

मुले:

११ वर्षांंखालील: अभिमन्यू शेटे वि. वि. अगस्त्या समताने, १३ वर्षांंखालील: विवान वायंगणकर वि. वि. विवान गद्रे, १५ वर्षांंखालील: आदित्य पडवळ वि. वि. विहान राठी, १७ वर्षांंखालीलः ओम दाबेकर वि. वि. शोबीत कर्नक

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content