Homeटॉप स्टोरीराज्यातल्या महाविकास आघाडीला...

राज्यातल्या महाविकास आघाडीला अखेरची घरघर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करून 24 तासही उलटत नाहीत तोच त्यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला अखेरची घरघर लागली आहे. महाविकास आघाडीने नियोजित केलेल्या पुढच्या चारही वज्रमूठ सभा रद्द झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात एकवाक्यता दिसून येत नाही. याउलट पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात परस्परांवर कुरघोडीही सुरू झाली आहे.

कालच शरद पवार यांनी लोक माझे सांगाती, या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन करताना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला. त्यापाठोपाठ राज्यातल्या महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीच्या भविष्याबद्दल शंकाकुशंका  निर्माण होऊ लागली. आज या नेत्यांनी त्यांच्या पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथील प्रस्तावित वज्रमूठ सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. येत्या १४ मेला पुण्यात, 28 मेला कोल्हापूरमध्ये, तीन जूनला नाशिक तर 11 जूनला अमरावतीत या वज्रमूठ सभा होणार होत्या. परंतु आता त्या सभा होणार नाहीत.

महाविकास

ऊन-पावसाचा खेळ

यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राज्यात सध्या प्रचंड ऊन आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रस्तावित सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळाच सूर लावला. राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडतोय. त्यामुळे या प्रस्तावित सभा होतील की नाही याबद्दल काही सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

महाविकास

राऊतांनी चोंबडेगिरी करू नये – नाना पटोले

एकीकडे महाविकास आघाडीला घरघर लागली असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना जसे काँग्रेसमध्ये सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे स्थान आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतही होईल. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष नाहीत, खासदारही नाहीत. मात्र काँग्रेसचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्याकडेच पाहिले जाते. तसेच शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष नसले तरी त्यांचेच नियंत्रण राष्ट्रवादीवर राहील, अशा आशयाचे विधान संजय राऊत यांनी केले. यावर बोलताना नाना पटोले यांनी राऊत यांना खडे बोल सुनावले. राऊत यांनी चाटूगिरी करू नये. काँग्रेसवर भाष्य करताना त्यांनी चोंबडेगिरी करू नये. अजित पवार यांनीही सांगितले आहे. ते लक्षात घेतले तर राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर बोलताना चोंबडीगिरी करू नये असे पटोले म्हणाले. त्यावर पलटवार करत संजय राऊत यांनी चोंबडेगिरी कोण करताय आणि चाटूगिरी कोण करत आहे, हे मी सांगू का, असा सवाल केला. मी बोलायला लागलो तर चोंबडा कोण आणि चाटू कोण हे स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

महाविकास

नितेश राणे यांचे भाकित खरे ठरले

दररोज सकाळी भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख घेणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपाकडून नितेश राणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीची एक मे रोजी होत असलेली वज्रमूठ सभा शेवटची असेल. यापुढे महाविकास आघाडीची कोणतीही सभा होणार नाही, असे ठासून सांगितले होते. त्यांनी केलेले भाष्य एक तारखेच्या सभेनंतर अवघ्या दोन दिवसांतच प्रत्यक्षात उतरले…

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content