Homeएनसर्कलभारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान...

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आजपासून!

जैवतंत्रज्ञान विभाग (डी. बी. टी.) संस्थेचे प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्र फरीदाबाद (हरियाणा) येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट येथे आजपासून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सुरू होत आहे. हा भव्य विज्ञान मेळा आज, 17 जानेवारीला सुरू होईल तर 20 जानेवारीला त्याची सांगता होईल. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय नवोन्मेष फाउंडेशन ह्या स्वायत्त संस्थेच्या सहकार्याने, या नवव्या विज्ञान महोत्सवाचे आयोजन आणि अंमलबजावणी करणार आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयात, भारताच्या कामगिरीचा, यशाचा उत्सव साजरा करणे हा या विज्ञान महोत्सवाचा उद्देश आहे. त्याशिवाय, विज्ञानप्रेमींच्या कामगिरीची दखल घेणे आणि युवा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे आणि भारतीय नागरिकांमध्ये त्याचा प्रसार करणे हा देखील महोत्सवाचा उद्देश आहे. राष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 ची मध्यवर्ती संकल्पना ‘अमृतकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे’ ही आहे.

विज्ञान

यंदाच्या म्हणजेच, विज्ञान महोत्सवामध्ये 22 देश सहभागी होत आहेत. यात अर्जेंटिना, आर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, केनिया, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, मलेशिया, म्यानमार, नामिबिया, फिलीपिन्स, रवांडा, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड, अमेरिका, व्हिएतनाम आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सवाच्या चारही दिवसांसाठी खालील कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

यात विद्यार्थी विज्ञान गाव (सायन्स व्हीलेज), विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नवे प्रयोग आणि शोध प्रत्यक्ष जाणून घेणे, खेळ आणि खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान, विद्यार्थी नवोन्मेष महोत्सव-स्पेस हॅकेथॉन, राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि केंद्र आणि राज्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव आणि अधिकारी यांची परिषद, आकांक्षी भारतासाठी शिक्षण-राष्ट्रीय विज्ञान शिक्षक कार्यशाळा, युवा शास्त्रज्ञ परिषद, नवीन युग तंत्रज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय सामाजिक संघटना आणि संस्थांची बैठक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष प्रदर्शन, स्टार्ट-अप, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष बी टू बी मीट म्हणजे, व्यावसायिकांची परस्पर बैठक यांचा समावेश आहे.

Continue reading

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी...

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन...
Skip to content