Homeडेली पल्स५ महिन्यांत भारताच्या...

५ महिन्यांत भारताच्या आंबा निर्यातीत झाली 19%ने वाढ!

भारताच्या कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा, तसेच वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत आंबा निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली असून निर्यात केलेल्या आंब्यांचे मूल्य 47.98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. गेल्या वर्षीच्या 40.33 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत या वर्षात भारताने आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे. 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व  कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा, यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने गेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात 48.53 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 22963.78 मेट्रिक टन आंबे निर्यात केले होते. तर चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत 47.98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 27330.02 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत. 2023 मधील हंगामात आंब्यांची निर्यात वाढवण्याच्या हेतूने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व अपेडा (APEDA) ने अमेरिकेच्या कृषी विभागाच्या पशु व वनस्पती आरोग्य परीक्षण सेवेच्या (APHIS) निरीक्षकांना वाशी, नाशिक, बेंगळुरू व अहमदाबाद येथील इरेडिएशन केंद्रात आमंत्रित केले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 या वर्षात भारताने अमेरिकेला केलेल्या आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच 2043.60 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत.

केंद्र सरकारच्या संस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताने अमेरिकेसह जपानला 43.08 मेट्रिक टन, न्यूझीलंडला 110.99 मेट्रिक टन, ऑस्ट्रेलियाला 58.42 मेट्रिक टन आणि दक्षिण आफ्रिकेला 4.44 मेट्रिक टन आंब्यांची निर्यात केली आहे. चालू आर्थिक वर्षात आंब्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2023 सालच्या हंगामात भारताने 41 देशांना आंबे निर्यात केले असून त्यात इराण, मॉरिशस आणि नायजेरियासारख्या नव्या बाजारपेठांचा समावेश आहे. 

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content