Homeडेली पल्स५ महिन्यांत भारताच्या...

५ महिन्यांत भारताच्या आंबा निर्यातीत झाली 19%ने वाढ!

भारताच्या कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा, तसेच वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत आंबा निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली असून निर्यात केलेल्या आंब्यांचे मूल्य 47.98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. गेल्या वर्षीच्या 40.33 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत या वर्षात भारताने आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे. 

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व  कृषी व प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात प्राधिकरण अर्थात अपेडा, यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताने गेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात 48.53 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 22963.78 मेट्रिक टन आंबे निर्यात केले होते. तर चालू (2023-24) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत 47.98 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 27330.02 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत. 2023 मधील हंगामात आंब्यांची निर्यात वाढवण्याच्या हेतूने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व अपेडा (APEDA) ने अमेरिकेच्या कृषी विभागाच्या पशु व वनस्पती आरोग्य परीक्षण सेवेच्या (APHIS) निरीक्षकांना वाशी, नाशिक, बेंगळुरू व अहमदाबाद येथील इरेडिएशन केंद्रात आमंत्रित केले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 या वर्षात भारताने अमेरिकेला केलेल्या आंबा निर्यातीत 19% वाढ नोंदवली आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच 2043.60 मेट्रिक टन आंबे निर्यात केले आहेत.

केंद्र सरकारच्या संस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताने अमेरिकेसह जपानला 43.08 मेट्रिक टन, न्यूझीलंडला 110.99 मेट्रिक टन, ऑस्ट्रेलियाला 58.42 मेट्रिक टन आणि दक्षिण आफ्रिकेला 4.44 मेट्रिक टन आंब्यांची निर्यात केली आहे. चालू आर्थिक वर्षात आंब्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2023 सालच्या हंगामात भारताने 41 देशांना आंबे निर्यात केले असून त्यात इराण, मॉरिशस आणि नायजेरियासारख्या नव्या बाजारपेठांचा समावेश आहे. 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content