Homeएनसर्कलविरोधकांच्या घोषणाबाजीवर सत्ताधाऱ्यांकडून...

विरोधकांच्या घोषणाबाजीवर सत्ताधाऱ्यांकडून ‘हिन्दुस्थान’चा उतारा! 

नागपूरमधल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभेत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.., फिरसे जीतेंगे हिन्दुस्थान… अशा घोषणा देत विधानसभा दणाणून टाकली आणि चार राज्यांच्या विधानसभांच्या नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालाचे पडसाद विधानसभेतही दिसून आले.

हिन्दुस्थान

सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या इमारतीच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. गळ्यात संत्र्याचे हार घालून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांच्यासह अनेक सदस्य पायऱ्यांपाशी आले. हातात घोषणांचे फलक घेत त्यांनी घोषणा दिल्या आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. त्यावर सभागृहात सत्ताधाऱ्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांतल्या घोषणाबाजीचा उतारा दिला.

हिन्दुस्थान

विरोधी पक्षांनी याच विषयावर स्धगन प्रस्ताव दिला होता. पण, तो अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात हा विषय उपस्थित करत राज्य सरकारने दुष्काळसदृश असा नवाच शब्दप्रयोग वापरला आहे, याकडे लक्ष वेधले. अवकाळी पावसासह विविध आपत्तींमुळे २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. पंचनामे केले जात नाहीत, याकडे लक्ष वेधत शेतकऱ्यांना सरसकट भरपाई दिली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हिन्दुस्थान

त्यावर अवकाळी पावसासह गारपीट तसेच चक्रीवादळासह कोणत्याही प्रकारची आपत्ती असेल तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील आणि त्यांना नुकसानभरपाई देईल, असे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे आणि यंदा पहिल्यांदाच २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम रक्कम जमा केली आहे. गेल्या वर्षी एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट भरपाई दिली होती आणि यंदा भरपाई देताना २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरची अट केली आहे, हे फडणवीस यांनी सांगताच सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content