Homeएनसर्कलपुण्याच्या जागेवरून महाविकास...

पुण्याच्या जागेवरून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा पुणे लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा दावा ठोकल्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. कालच या मतदारसंघावर आपला दावा सांगताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या भागात कोणाची ताकद किती आहे हे बघूनच महाविकास आघाडीने उमेदवारी निश्चित

महाविकास

करावी असे म्हटले होते. यासाठी महापालिका, नगरपालिका, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच विधानसभा सदस्यांच्या  संख्येचा विचार व्हावा आणि मगच महाविकास आघाडीने निर्णय करावा, असे ते म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी, पुण्याची पोटनिवडणूक असू दे किंवा पुढच्या वर्षी होणारी निवडणूक असू दे, पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार असल्याचे स्पष्ट केले. ही जागा काँग्रेसची होती, आहे आणि पुढेही राहणार असेही ते म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असे सांगत सगळ्यांनाच अप्रत्यक्षपणे सबुरीचा सल्ला दिला आहे. तुटेपर्यंत कोणीही ताणू नये, असे ते म्हणाले.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content