Homeचिट चॅटशिवाजी पार्क जिमखाना...

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत हरेश्वर, काजल विजेते

मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखाना आयोजित आणि सारस्वत बँक पुरस्कृत १६व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या हरेश्वर बेतवंशीने आपले पहिले विजेतेपद पटकविताना अनुभवी पुण्याच्या सागर वाघमारेचा सरळ दोन सेटमध्ये २५-८, २२-१४ असा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दोनही सेटमध्ये हरेश्वरने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले होते. दुसरीकडे महिलांच्या अंतिम सामन्यात अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या काजल कुमारीने पालघरच्या श्रुती सोनावणेला २५-४, २५-९ सहज हरवून विजेतेपद पटकाविले. विजेत्या हरेश्वरने २५ हजारांची तर काजलने ८ हजरांची कमाई केली.

पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने मुंबईच्या संदीप देवरूखकरवर २५-७, २५-१० अशी मात केली, तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने ठाण्याच्या रिंकी कुमारीवर १७-१४, २५-४ अशी मात केली.

विजेत्या खेळाडूंना शिवाजी पार्क पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास दातीर यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देण्यात आले. याप्रसंगी जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर, सहसचिव सुनील रामचंद्रन, इनडोअर सचिव सुनील समेळ, ट्रस्टी लता देसाई, महेंद्र ठाकूर, प्रकाश नायक, मिलिंद सबनीस, कॅरम विभाग सचिव अजय पाटणकर, खजिनदार सी ए. विलास सोमण तसेच राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मंजूर अहमद खान, सचिव अरुण केदार, सहसचिव केतन चिखले व योगेश फणसाळकर उपस्थित होते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content