Tuesday, February 4, 2025
Homeहेल्थ इज वेल्थरेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात...

रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात तातडीने रोखली!

केंद्र सरकारने वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता कोरोनावरील उपचारांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन व रेमडेसिविर इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांच्या (API) निर्यातीवर, कोविडसंबधित परिस्थितीत सुधार होईपर्यंत बंदी घातली आहे.

भारतात सध्या कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. आज, म्हणजेच, 11 एप्रिल 2021 रोजी देशात 11.08 लाख कोविड रुग्णसंख्या असून, त्यात हळूहळू वाढ होत आहे. यामुळे कोविड रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये या मागणीत अजून वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या इंजेक्शनच्या निर्यातीवर सरकारने तातडीने बंदी घातली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अमेरिकेच्या मेसर्स  गिलीड सायन्सेसकडून ऐच्छिक परवाना करारान्वये सात भारतीय कंपन्या रेमडेसिविर इंजेक्शनची निर्मिती करत आहेत. त्यांची क्षमता प्रतिमहिना 38.80 लाख इतकी आहे.

याशिवाय रुग्ण व रुग्णालयांना रेमडेसिविर सहजपणे उपलब्ध होण्यासाठी केंद्राने इतर अनेक पावले उचलली आहेत.

  1. औषधाची उपलब्धता गरजूंना सहजपणे कळावी, म्हणून देशातील रेमडेसिविरच्या सर्व उत्पादकांनी त्यांच्या संकेतस्थळावर त्याच्याकडील साठा व वितरक यांची माहिती द्यावी असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
  2. औषध तपासनीस (ड्रग इन्स्पेक्टर) व इतर अधिकाऱ्यांना औषधाच्या साठ्याची तपासणी करून त्यासंबधीचे गैरप्रकार रोखण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्याचप्रमाणे त्याचा साठा व काळ्या बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी परिणामकारक कारवाईचे अधिकार दिले आहेत. संबधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे  आरोग्य सचिव याबाबतीत औषध तपासनीसांच्या कामाचा आढावा घेणार आहेत.
  3. रेमडेसिविरच्या उत्पादनवाढीला चालना देण्याच्या दृष्टीने औषध विभाग देशातील उत्पादकांच्या संपर्कात आहे.

अनेक अनुभवी तज्ज्ञ आणि तज्ज्ञ समितींच्या सहयोगातून, तथ्ये आणि पुराव्यांच्या आधारे तयार करण्यात आलेली ‘कोविड-19 राष्ट्रीय औषधोपचार नियमावली’ ही कोविड रुग्णांवरील उपचारासाठी मार्गदर्शक असल्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

या नियमावलीनुसार रेमडेसिविर ही इन्वेस्टिगेशनल उपचारपद्धती म्हणजे ती देण्याबाबतचा निर्णय तज्ज्ञांच्या विचारविनिमयाने करून त्याबाबतची निरिक्षणे नोंदविणे आवश्यक असणारी आहे. याशिवाय त्याचा वापर केव्हा करू नये यासंबधी नियमावलातील निर्देशांचे पालन करावे असेही सांगण्यात आले आहे. यासंबधी सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयांना सूचित करावे आणि नियमपालनावर देखरेख ठेवण्याच्या सूचनाही केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content