Homeएनसर्कलडिझेलची तस्करी करणाऱ्या...

डिझेलची तस्करी करणाऱ्या मच्छिमारी नौकेला पकडले!

डिझेल तस्करी करणाऱ्या ‘जय मल्हार’, या मच्छिमारी नौकेला आणि तिच्यावरच्या पाच जणांना भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्र किनाऱ्याजवळ गुरूवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे 27 लाख रुपयांचे बेहिशोबी पाच टन डिझेल आणि काही प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेली नौका, पोलीस, सीमाशुल्क आणि मत्स्योद्योग विभागाकडून चौकशी करण्यासाठी मुंबई बंदरावर आणण्यात आली. नौकेवरील व्यक्तींनी आधीच 5,000 लिटर इंधन मच्छिमारांना भरसमुद्रातच विकल्याचे पुढील तपासात उघड झाले.

या यशस्वी मोहिमेमुळे समुद्रातील डिझेलची तस्करी रोखण्यात भारतीय तटरक्षक दलाला आणखी यश प्राप्त झाले आहे. गेल्या तीन दिवसात 55,000 लिटर बेहिशोबी डिझेल जप्त करण्यात आले आहे. देशाच्या सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि किनारपट्टीच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी त्वरित आणि समन्वित कृतींच्या महत्त्वावर भर देत, सागरी क्षेत्रात बेकायदेशीर कृत्यांना पायबंद घालण्यासाठी सदैव प्रतिबद्ध असल्याचे भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.  

Continue reading

कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर राज्यमंत्रीपदही जाईल…

मी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर मला राज्यमंत्रीपदही सोडावे लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. या वाक्याचे स्पष्टीकरणही लगेचच त्यांनी केले. केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये असलेल्या लहान पक्षांच्या प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांच्या पक्षाचे दोन-चार खासदार निवडून...

तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर पडून!

ईश्वर सर्वव्यापी आहे, तसेच प्लास्टिकही आज सर्वव्यापी झाले असून हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या सखोल भागापर्यंत प्लास्टिक पोहोचले आहे. तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजदेखील जमिनीच्या पोटात कोठेतरी पडून आहे. त्यामुळे प्लास्टिक वस्तू व प्लास्टिक आवरणामुळे होणारे प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज...

इराणमधील भारतीयांना तातडीने देश सोडण्याचे आदेश! नवी ॲडव्हायझरी जारी!!

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि नुकत्याच घोषित झालेल्या दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा (सीझफायर) फायदा घेऊन, केंद्र सरकारने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने यासंदर्भात...
Skip to content