Homeमुंबई स्पेशलरोहित पवार, राजेश...

रोहित पवार, राजेश टोपे यांच्यावरही गुन्हे दाखल करा!

दगडफेक करुन हिंसा भडकवण्याचे षडयंत्र रचणारे, कारखान्यात याचे नियोजन करणारे राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन, या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. यावेळी विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा दरेकर यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणाच्या दौर्‍यावर असताना, अमृत महोत्सवी की रौप्य महोत्सवी वर्ष हे माहिती नसणार्‍याला कानाखाली मारली असती या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर, मविआ सरकारने राणेंवर गुन्हे  दाखल करुन, तुरुंगात टाकले होते. मग आता उपमुख्यमंत्र्यांबाबतीत जरांगे अश्लाघ्य वक्तव्य करत असतील तर, या राज्यात सर्वांसाठी कायदा सारखा असला पाहिजे. त्यामुळे जरांगेंवरदेखील गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर आम्हीही सोबतच राहिलेलो आहोत. पण लोकं जमली म्हणून डोक्यात हवा जाऊन अहंकार आला. आणि याला बघून घेईन, त्याला बघून घेईन, बामणी कावासारखी भाषा यांच्या तोंडी आली. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही. याची चौकशी करुन, कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी केली.

जरांगेंनी सांगिलं होते की, मी समाजाकडून एक रुपया घेणार नाही. कुणी वर्गणी गोळा करायची नाही. मग मोठमोठे मोर्चे निघाले, जेसीबीने पुप्षवर्षा करण्यात आली. या सभांसाठी लाखो रुपये झालेला खर्च, ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले. ते आले कुठून? मराठा आंदोलक आणि जरांगे यांच्या सहकारी संगिता वानखेडे यांनी सांगितले की, या आंदोलनाचा संपूर्ण खर्च शरद पवार यांनी केला. त्यांचे बॅनर, पोस्टरचा खर्चसुध्दा पवारांचेच नेते करत होते. एवढेच नाही तर, जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. पण शरद पवारांचे जरांगेंना फोन येत होते आणि जरांगे पवारांचेच ऐकत होते, असे वानखेडे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवारांचे फोन जरांगेंना येत होते का?, जरांगे शरद पवारांच्या सांगण्यानुसार वागत होते का? याची चौकशी झाली पाहिजे. आणि या आंदोलनासाठी झालेल्या आर्थिक उलाढालीची चौकशीदेखील ईडीमार्फत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content