Homeमुंबई स्पेशलरोहित पवार, राजेश...

रोहित पवार, राजेश टोपे यांच्यावरही गुन्हे दाखल करा!

दगडफेक करुन हिंसा भडकवण्याचे षडयंत्र रचणारे, कारखान्यात याचे नियोजन करणारे राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन, या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. यावेळी विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा दरेकर यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणाच्या दौर्‍यावर असताना, अमृत महोत्सवी की रौप्य महोत्सवी वर्ष हे माहिती नसणार्‍याला कानाखाली मारली असती या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर, मविआ सरकारने राणेंवर गुन्हे  दाखल करुन, तुरुंगात टाकले होते. मग आता उपमुख्यमंत्र्यांबाबतीत जरांगे अश्लाघ्य वक्तव्य करत असतील तर, या राज्यात सर्वांसाठी कायदा सारखा असला पाहिजे. त्यामुळे जरांगेंवरदेखील गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर आम्हीही सोबतच राहिलेलो आहोत. पण लोकं जमली म्हणून डोक्यात हवा जाऊन अहंकार आला. आणि याला बघून घेईन, त्याला बघून घेईन, बामणी कावासारखी भाषा यांच्या तोंडी आली. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही. याची चौकशी करुन, कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी केली.

जरांगेंनी सांगिलं होते की, मी समाजाकडून एक रुपया घेणार नाही. कुणी वर्गणी गोळा करायची नाही. मग मोठमोठे मोर्चे निघाले, जेसीबीने पुप्षवर्षा करण्यात आली. या सभांसाठी लाखो रुपये झालेला खर्च, ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले. ते आले कुठून? मराठा आंदोलक आणि जरांगे यांच्या सहकारी संगिता वानखेडे यांनी सांगितले की, या आंदोलनाचा संपूर्ण खर्च शरद पवार यांनी केला. त्यांचे बॅनर, पोस्टरचा खर्चसुध्दा पवारांचेच नेते करत होते. एवढेच नाही तर, जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. पण शरद पवारांचे जरांगेंना फोन येत होते आणि जरांगे पवारांचेच ऐकत होते, असे वानखेडे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवारांचे फोन जरांगेंना येत होते का?, जरांगे शरद पवारांच्या सांगण्यानुसार वागत होते का? याची चौकशी झाली पाहिजे. आणि या आंदोलनासाठी झालेल्या आर्थिक उलाढालीची चौकशीदेखील ईडीमार्फत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content