Homeपब्लिक फिगरमाझ्या राज्यपालपदाच्या कारकीर्दीतच...

माझ्या राज्यपालपदाच्या कारकीर्दीतच झाले फैजाबादचे अयोध्या!

२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साही वातावरणात झाली. या अयोध्या नगरीचे नाव फैजाबाद होते. ते नाव तसेच राहिले असते तर फैजाबादेत राममंदिर असे विचित्र चित्र दिसले असते, म्हणून मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल असताना फैजाबादचे अयोध्या, असे नामांतर केले. अलाहाबादचे प्रयागराज केले. बॉम्बे, बंबईचे मुंबई केले, अशा शब्दांत माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक यांनी आपल्या कारकीर्दितील कामांना उजाळा दिला.

‘कुटूंब रंगलंय काव्यात’चे सर्वेसर्वा प्रा. विसुभाऊ बापट आणि उमा बापट आयोजित ‘कोसल्येचा राम’ या सांगितिक रामकथेच्या कार्यक्रमाचे मुंबईतल्या दादरच्या शिवाजी मंदिरात हर्षोल्हासाच्या वातावरणात आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राम नाईक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना फैजाबादचे नामांतर आपण राज्यपाल असताना घडवून आणले असल्याचा दावा केला.

उमा बापट यांनी वाल्मिकी रामायणात उल्लेखिलेल्या प्रभू रामचंद्रांच्या वयाच्या सोळा वर्षांपासूनच्या विविध घटनांचा अतिशय सुंदर पद्धतीने कथाकथन करीत प्रा. विसुभाऊ बापट, मेघा प्रभूदेसाई, रोहित प्रभूदेसाई, अर्चना दिनेश यांनी राम आणि सीतामाई यांच्या कथांमधील गीतांचे सुमधुर आवाजात गायन केले. उमा बापट यांनी श्रवणीय निरुपण केले. डॉ. किशोर खुशाले यांनी तालवाद्य तर रोहित प्रभूदेसाई यांनी तबल्यावर उत्तम साथ दिली.

नितीन सावंत आणि विजय सूर्यवंशी हे या कार्यक्रमाचे सूत्रधार असून प्रा. विसुभाऊ आणि उमा बापट दांपत्याने अवघे शिवाजी मंदिर राममय केले. प्रभू रामनामाचा गजरात अवघे सभागृह न्हाऊन निघाले. कुटूंब रंगलंय काव्यात, या कार्यक्रमाला ४३ वर्षे पूर्ण झाली असून ३१११ प्रयोग झाले असल्याची माहिती प्रा. विसुभाऊ बापट यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली.

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content