Homeपब्लिक फिगरमाझ्या राज्यपालपदाच्या कारकीर्दीतच...

माझ्या राज्यपालपदाच्या कारकीर्दीतच झाले फैजाबादचे अयोध्या!

२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साही वातावरणात झाली. या अयोध्या नगरीचे नाव फैजाबाद होते. ते नाव तसेच राहिले असते तर फैजाबादेत राममंदिर असे विचित्र चित्र दिसले असते, म्हणून मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल असताना फैजाबादचे अयोध्या, असे नामांतर केले. अलाहाबादचे प्रयागराज केले. बॉम्बे, बंबईचे मुंबई केले, अशा शब्दांत माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक यांनी आपल्या कारकीर्दितील कामांना उजाळा दिला.

‘कुटूंब रंगलंय काव्यात’चे सर्वेसर्वा प्रा. विसुभाऊ बापट आणि उमा बापट आयोजित ‘कोसल्येचा राम’ या सांगितिक रामकथेच्या कार्यक्रमाचे मुंबईतल्या दादरच्या शिवाजी मंदिरात हर्षोल्हासाच्या वातावरणात आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राम नाईक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना फैजाबादचे नामांतर आपण राज्यपाल असताना घडवून आणले असल्याचा दावा केला.

उमा बापट यांनी वाल्मिकी रामायणात उल्लेखिलेल्या प्रभू रामचंद्रांच्या वयाच्या सोळा वर्षांपासूनच्या विविध घटनांचा अतिशय सुंदर पद्धतीने कथाकथन करीत प्रा. विसुभाऊ बापट, मेघा प्रभूदेसाई, रोहित प्रभूदेसाई, अर्चना दिनेश यांनी राम आणि सीतामाई यांच्या कथांमधील गीतांचे सुमधुर आवाजात गायन केले. उमा बापट यांनी श्रवणीय निरुपण केले. डॉ. किशोर खुशाले यांनी तालवाद्य तर रोहित प्रभूदेसाई यांनी तबल्यावर उत्तम साथ दिली.

नितीन सावंत आणि विजय सूर्यवंशी हे या कार्यक्रमाचे सूत्रधार असून प्रा. विसुभाऊ आणि उमा बापट दांपत्याने अवघे शिवाजी मंदिर राममय केले. प्रभू रामनामाचा गजरात अवघे सभागृह न्हाऊन निघाले. कुटूंब रंगलंय काव्यात, या कार्यक्रमाला ४३ वर्षे पूर्ण झाली असून ३१११ प्रयोग झाले असल्याची माहिती प्रा. विसुभाऊ बापट यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content