Homeकल्चर +पार्ले महोत्सवात ६...

पार्ले महोत्सवात ६ महिन्यांच्या बालकांनीही मारली बाजी

वर्षभर पार्ले महोत्सवातील स्पर्धांची प्रतीक्षा करणाऱ्या स्पर्धकांनी यंदा एकच रंगत आणली असून प्रत्येकजण आपले कसब पणाला लावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या महोत्सवात वेगवेगळ्या ३२ स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात सदृढ बालक स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांचाही सहभाग आहे, हे विशेष. यातील सदृढ बालक स्पर्धेत सहा महिन्यांच्या सात्विक खातू, यशस्विनी सोनार, अरझान खान या बालकांनी बाजी मारली.

पार्ले

६ ते  १२ महिन्यांच्या वयोगटात निशिता सिद्पुरा, प्रियांश राड्ये, प्रणशी श्रीकार यांनी पहिल्या तिघांमध्ये तर तनीश व्होरा, विरा पाटेरे, आयर्व यादव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. १ ते २ वर्षे वयोगटात क्रिशिव नाईक, श्रेयाशी कदम, मान व्होरा यांना पहिली तीन तर युविका पटेल, युवान पटेल, शिवम गौरव, आनार्य परमार, युवान चंदालिया, अथेना कांत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

पार्ले

वामन मंगेश दुभाषी मैदान, साठ्ये महाविद्यालय, पार्ले टिळक विद्यालय, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, उत्कर्ष मंडळ सभागृह, सहार गाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा सुरु आहेत. सदृढ बालक, कबड्डी, मल्लखांब, बुद्धीबळ, पिकल बॉल, फुटबॉल, सायकलिंग, व्हॉली बॉल, बॉक्स क्रिकेट, शरीरसौष्ठव, कॅरम, गायन, चित्रकला, हस्ताक्षर लेखन, मेहंदी, रांगोळी, आदी स्पर्धा गेल्या दोन दिवसांमध्ये आयोजित करण्यात आल्या.

विविध गटांमधील स्पर्धांची प्राथमिक फेरी झाली असून आता येत्या दोन दिवसांत त्यांच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांची लढत होईल. सध्या तरी या फेऱ्यांसाठी खेळांडूंमध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे. स्पर्धांमधील उत्साह हा अत्यंत भारावणारा आहे तसेच या स्पर्धांमधील खेळाडू अथवा स्पर्धक हे नक्कीच भविष्यात आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा लौकिक वाढवतील, असा विश्वास महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार पराग अळवणी यांनी व्यक्त केला.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content