Homeमाय व्हॉईसउद्धव ठाकरेंच्या काळात...

उद्धव ठाकरेंच्या काळात फुटकी कवडी मिळाली नाही!

निधी मंजूर करणे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार आहे. विविध विकासकामांची अनेक प्रपोजल मुख्यमंत्र्यांकडे येत असतात. त्यातले सगळेच मंजूर होतात असे नाही. परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे मुख्यमंत्री ठरवतात. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो. परंतु अशी कधी चर्चा करण्याची वेळ आली नाही. मात्र गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्षांच्या आमदारांना फुटकी कवडी मिळाली नाही. आम्हाला शहाणपणा शिकवणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हा शहाणपणा आधीच्या सरकारला शिकवला असता तर चांगले झाले असते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले.

विधान परिषदेत आज काल दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरूवात झाली. कामकाज सुरू होताच उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलण्याची परवानगी दिली. दानवे यांनी यावेळी आमदारांच्या निधीवाटपाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारकडून निधीवाटपात असमानता दाखवली आहे. काही सदस्यांना ५०-६० कोटींचा निधी मिळाला आहे तर काहींना दोन कोटीही मिळाले नाहीत, असे ते म्हणाले.

विधानसभा व विधानपरिषद आमदारांना असमान निधीवाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्याय होत आहे. विधान परिषदेच्या आमदारांना ४६ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. निधीवाटपाची रक्कम जनतेच्या करातून वसूल करून दिली जाते. ज्या मतदारसंघात निधी दिला नाही तेथील जनता कर भरत नाही का? त्यांना विकासाचा अधिकार नाही का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. असमान निधीवाटप झाला की नाही याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. भाई जगताप, सचिन अहिर यांनीही या विषयावर मत मांडले.

विधान परिषदेतल्या सदस्यांनाही विकासकामांसाठी निधी मिळावा यादृष्टीने आपण मुख्यमंत्री तसेच वित्त मंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. निधीवाटपात कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले. नवीन सरकार आल्यानंतर आम्ही विविध सदस्यांच्या कामांना स्थगिती दिली होती. परंतु मेरिट व त्याची तपासणी करून बहुतांशी कामांवरची स्थगिती उठवलेली आहे. काँग्रेसच्या किमान 15 जणांची नावे आपण देऊ शकतो की ज्यांचे दीडशे-दीडशे कोटींच्या कामांवरची स्थगिती आम्ही उठवलेली आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content