Homeमाय व्हॉईसनिवडणुकांच्या कामासाठी जाऊ...

निवडणुकांच्या कामासाठी जाऊ नका! काय होते ते मी पाहतो!!

तुम्ही निवडणुकांच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिरमधले शिक्षक आपल्याला भेटले. त्यांनी निवडणूक आयोगाने निवडणूक तयारीच्या कामासाठी बोलावल्याचे सांगितले. चार हजारांहून जास्त शिक्षकांना आयोगाने बोलावले आहे. हे शिक्षक तेथे गेले तर विद्यार्थ्यांचा अभ्यास कोण घेणार? त्यामुळे या शिक्षकांना आपण आयोगाच्या कामासाठी न जाण्याचा सल्ला दिला आहे. आमचे प्रतिनिधी लवकरच निवडणूक आयोगाशी चर्चा करेल आणि यावर मार्ग काढेल, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपण्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. शिक्षक निवडणुकीच्या काळात कामे करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल त्यांनी केला. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवे आहेत. हे शिक्षक कशासाठी हवेत? निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो? तुम्हाला पाच वर्षांत यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोक लागणार, ते तुम्हाला माहिती नाही? शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content