Homeचिट चॅटसीमेवरील १५ हजार...

सीमेवरील १५ हजार सैनिकांना ‘अनाम प्रेम’चा दिवाळी फराळ!

सद्गुरू अडाणेश्वरांचा भक्त परिवार म्हणून ओळखण्यात येणाऱ्या “अनाम प्रेम” परिवारातर्फे या दिवाळीत १५ हजार सैनिकांना फराळ पाठविण्यात आला आहे. मुंबईतल्या मालाड येथील कोळी समाज सभागृहात फराळ तयार करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

आपल्या परिवारापासून दूर असलेले सैनिक प्राणांची बाजी लावून देशासाठी लढतात, बलिदान करतात याची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लेह, लडाख, अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू- काश्मीर, पंजाब-अमृतसर या सीमावर्ती भागात फराळ पाठविण्यात आला आहे. काही ठिकाणी नाविक दल आणि हवाई दलाच्या सैनिकांनाही हा फराळ पाठविण्यात आला आहे.

सीमेवरील सैनिकांना फराळ पाठविण्याचे हे कार्य गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. केवळ सैनिकच नव्हे तर पोलीस, बेस्टचे वाहक-चालक, अनाथ मुले, देहविक्रय करणार्‍या निराधार महिला, रुग्णालयातील परिचारिका अशा विविध वर्गातील कर्मचार्‍यांना “अनाम प्रेम”चे प्रेम लाभले आहे.

“प्रेम शिंपित जा” या बोधवाक्याला अनुसरून परिवाराचे सर्व कार्यकर्ते मुंबई-महाराष्ट्राच्या विविध भागात हे कार्य करीत असतात. गेल्या वीस वर्षांपासून हे कार्य सुरू आहे, आणि यापुढेही असेच सुरू राहणार आहे, अशी माहिती “अनाम प्रेम” च्या हिमा नगरे (भ्रमणध्वनी – ९८७००९०९९४) यांनी दिली.

Continue reading

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...

रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांचे निधन

महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर विकास गुप्ते यांचे आज, ६ जुलै २०२६ रोजी वयाच्या ६५व्या वर्षी कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते शेवटच्या श्वासापर्यंत कामगार...
Skip to content