Homeचिट चॅटसीमेवरील १५ हजार...

सीमेवरील १५ हजार सैनिकांना ‘अनाम प्रेम’चा दिवाळी फराळ!

सद्गुरू अडाणेश्वरांचा भक्त परिवार म्हणून ओळखण्यात येणाऱ्या “अनाम प्रेम” परिवारातर्फे या दिवाळीत १५ हजार सैनिकांना फराळ पाठविण्यात आला आहे. मुंबईतल्या मालाड येथील कोळी समाज सभागृहात फराळ तयार करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

आपल्या परिवारापासून दूर असलेले सैनिक प्राणांची बाजी लावून देशासाठी लढतात, बलिदान करतात याची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लेह, लडाख, अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू- काश्मीर, पंजाब-अमृतसर या सीमावर्ती भागात फराळ पाठविण्यात आला आहे. काही ठिकाणी नाविक दल आणि हवाई दलाच्या सैनिकांनाही हा फराळ पाठविण्यात आला आहे.

सीमेवरील सैनिकांना फराळ पाठविण्याचे हे कार्य गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. केवळ सैनिकच नव्हे तर पोलीस, बेस्टचे वाहक-चालक, अनाथ मुले, देहविक्रय करणार्‍या निराधार महिला, रुग्णालयातील परिचारिका अशा विविध वर्गातील कर्मचार्‍यांना “अनाम प्रेम”चे प्रेम लाभले आहे.

“प्रेम शिंपित जा” या बोधवाक्याला अनुसरून परिवाराचे सर्व कार्यकर्ते मुंबई-महाराष्ट्राच्या विविध भागात हे कार्य करीत असतात. गेल्या वीस वर्षांपासून हे कार्य सुरू आहे, आणि यापुढेही असेच सुरू राहणार आहे, अशी माहिती “अनाम प्रेम” च्या हिमा नगरे (भ्रमणध्वनी – ९८७००९०९९४) यांनी दिली.

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content