Homeचिट चॅटनवी मुंबईत 'स्वच्छ...

नवी मुंबईत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’!

सणासुदीचा हंगाम जवळ आला असताना, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) नेतृत्त्वाअंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ ही देशव्यापी मोहीम विशेष प्रकाशात येत आहे, जी नागरिकांना स्वच्छ आणि हरित पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करत आहे.

नवी मुंबईकर या चळवळीला मनापासून स्वीकारत असून नवी मुंबईत शॉपिंग मॉल्समधून सुरू केलेल्या सेल्फी मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत. हा अनोखा उपक्रम ग्राहकांना मॉल्समध्ये जाण्यासाठी आकर्षित करत आहे.

दुसऱ्या स्वच्छ भारत मिशन-शहर अभियान (2.0) अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ मोहिमेचा एक भाग असलेल्या स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी खरेदीदारांना स्वाक्षरी मोहीमेत (साइन अप) सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानंतर ते मॉलमधील सेल्फी पॉइंट्सवरून स्वच्छ दिवाळी सेल्फीद्वारे आपली पर्यावरणाबाबत जागरूकता आणि स्वच्छता यासह दिवाळी साजरी करण्याची आपली वचनबद्धता प्रदर्शित करु शकतात. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी साइन अप केलेल्या नागरिकांना खरेदीसाठी सवलतीच्या दरातील भेटकूपन ही दिली जात आहेत, ज्यामुळे निवड करणाऱ्यांमधे सकारात्मक मनोभावना निर्माण होत आहे. हा एक अनोखा उपक्रम असून त्यात नागरिकांचा समावेश असून स्वच्छतेच्या वचनबद्धतेसह उत्सवाचे प्रतिबिंब त्यातून दिसून येत आहे.

ही मोहीम केवळ नागरिकांना जनआंदोलनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत नाही तर स्वच्छ दिवाळीसाठी त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व म्हणूनही काम करत आहे. या प्रयत्नात नवी मुंबईकर एकत्र आल्याने, स्वच्छ दिवाळी ‘शुभ दिवाळी’ ही केवळ मोहीम बनली नाही तर ती हरीत, स्वच्छ आणि अधिक शाश्वत पध्दतीने सणासुदीचे दिवस साजरे करण्याच्या सामूहिक चळवळीत बदलले आहे.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content