Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्री कधी अयोध्येत,...

मुख्यमंत्री कधी अयोध्येत, कधी पांडुरंगापुढे, भक्तांचे मात्र वावडे!

मदिरेच्या सापडलेल्या बाटल्या मंत्रालयात टनावर गोळा होतात. हृदयसम्राटांनी आणि प्रबोधनकारांनी अंधश्रद्धेवर आघात करून मराठी मुलखाला श्रद्धेचा देव सांगितला होता. आज राज्याचे मुख्यमंत्री आयोध्येला जातात. पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि भक्तांना मात्र सरकारी आदेशाने देवाच्या दर्शनाला बंदी घालतात. हा अन्याय, ही मुस्कटदाबी पांडुरंगाचे वारकरी आणि रामाचे भक्त कदापी सहन करणार नाही, असा इशारा राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आज दिला.

सरकारने पाच महिने मंदिरे बंद ठेवून हिंदूंच्या भावना दुखावणारा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने गेली पाच महिने सरकारी आदेशाने मंदिरे बंद ठेवली आहेत. मंदिरे बंद ठेवून मदिरा खुली करण्याचे महसुली कारस्थान आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे बुद्ध विहार असो अगर पांडुरंगाचे मंदिर असो, अशी श्रद्धास्थाने बंद असल्यामुळे सामान्य भक्ताच्या उपजीविकेची साधनेच या सरकारने बंदिस्त करून ठेवली आहेत. त्यामुळे श्रद्धाळू गरीब लोकांची उपासमार होत आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकार अशा गरीब लोकांना काहीतरी मदत करेल असे वाटले होते. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरू झाली आहेत. येथे मोर्चा, बैठका, लग्नसोहळे, बारशाचे कार्यक्रम मात्र धुमधड्यात, दिमाखात चालू असून देवधर्मावर सातत्याने अन्याय करणारे देवीदेवतांना बंदिस्त करून श्रद्धाळू भक्तांची उपासमार करत आहे. आघाडी सरकारने तत्काळ मंदिरे उघडावीत. तुळजापूर, गांणगापूर, सिद्धेश्‍वर, रूपाभवानी ही भक्तांची श्रद्धास्थाने वारकऱ्यांचा पांडुरंग तत्काळ देवदेवतांचा दरवाजा उघडावा. श्रावणाच्या पवित्र मुहुर्तावर भाजपाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे आज शंखनादाच्या राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केलेले आवाहन योग्य असून आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने पाठींबा दिला आहे. परिसरातील प्रमुख मंदिरे, धार्मिक स्थळांसमोर टाळ, घंटा व शंख वाजवून नारा देत आंदोलन करावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलेच आहे. त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही ढोबळे यांनी केले आहे.

कंस मामाचा कर्दनकाळ अर्थात कृष्ण जन्माच्या भीतीने कंस मामाने वसुदेव देवकीला बंदिस्त केले होते. परंतु विधीलिखीत घडणारा प्रसंग राज्यालाही टाळता आला नव्हता. आज केवळ गोळा होणाऱ्या महसुलाच्या मोहापोटी सरकार मंदिरे बंद ठेवून दारूची दुकानं उघडी ठेवतंय. कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसने राष्ट्रीय पक्ष कुंटुंबातच मर्यादित केल्यामुळे कुंटुंबालाच कार्यकारणी समजून राष्ट्रीय पक्षाच्या मालकीचा सातबारा केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content