Homeचिट चॅटदिव्यांगजनांना सक्षम बनवण्याचा...

दिव्यांगजनांना सक्षम बनवण्याचा 40 वर्षांचा प्रवास साजरा

मुंबईच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) AYJNISHD(D) अर्थात अली यावर जंग राष्ट्रीय मूकबधीर आणि कर्णबधीर संस्थेच्या 40 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटन आमदार आशिष शेलार यांनी नुकतेच केले. विविध रंगीबेरंगी सांस्कृतिक उपक्रमांसह भव्य उद्घाटन सोहोळ्यात भारताच्या विविध भागांतील दिव्यांगजन कर्मचारी आणि विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसह सर्व सहभागींना समावेश आणि संधी प्रदान करण्यात आली. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ही संकल्पना असलेल्या 75 वर्षांच्या कामगिरीच्या अनुषंगाने चार दशकांच्या कामगिरीचे प्रदर्शन, विविध क्षेत्रातील उत्क्रांती आणि प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे वातावरण निर्मितीही झाली.

AYJNISHD(D), ही मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या (DPwD) प्रमुख सर्वोच्च राष्ट्रीय संस्थांपैकी एक आहे.

यावेळी बोलताना ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील तसेच देशातील मूकबधीर आणि कर्णबधीर व्यक्तींच्या समस्या दूर करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सेवा, प्रयत्नांचे कौतुक केले. भारत सरकारच्या या संस्थेने गेल्या 40 वर्षांपासून समाजातील सदस्यांना दिलेल्या अविरत सेवेबद्दल त्यांनी अभिनंदन केले. त्यांनी 10-20 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सर्व कर्मचार्‍यांना पुरस्कृत प्रदान केला आणि AYJNISHD(D) च्या विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, डॉ. हंस, ईसी सदस्य, कॉक्लियर प्रत्यारोपण सर्जन यांनी ‘कॉक्लियर इम्प्लांट: तंत्र आणि तंत्रज्ञानातील बदलत्या कलाचा अंगिकार’ या विषयावर चर्चा केली. या सत्राचे उद्दिष्ट श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी कॉक्लियर इम्प्लांटच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातील अलीकडील वैज्ञानिक कल प्रदान करणे हा आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content