स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग हद्दीत, पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वेस्थानकावरून जाणारा उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी तब्बल १,१००...
मुंबई महापालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या एकूण २२६ इमारतींची यादी महानगरपालिकेने जाहीर केली आहे. ही यादी पालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर उपलब्ध आहे....
मुंबईच्या दादर पश्चिम परिसरात १४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी सकाळी ८ ते रविवार...
मुंबई पूर्व उपनगर ते शहर यामधील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या परळ टी टी उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे....
मुंबईत कडाक्याच्या उन्हात नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना पकडण्यासाठी रस्त्यावर सिग्नलच्या पुढे-मागे दबा धरून बसणाऱ्या ५५ वर्षांवरच्या पोलिसांनी आता सुस्कारा सोडायला हरकत नाही. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या...
मुंबईचे माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांचे गेल्या मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाने सर्वपक्षीय शोकसभा रविवारी मुंबईच्या...
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. २५ जून ते ०५...
कर्जवसुलीसाठी मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष द्या, छोट्या शेतकऱ्यांच्या मागे लागू नका, त्यांना त्रास देऊ नका अशा सूचना जिल्हा बॅंकांना देण्यात आल्या आहेत, असे सांगतानाच मुख्यमंत्री...